'जेट' वाचवण्यासाठी मोदींना साकडे

    15-Apr-2019
Total Views | 40




मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज विमान कंपनीला वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टेट बॅंकेने पुढाकार घ्यावा, अशी विनंती 'नॅशनल एव्हीएटर गिल्ड' या वैमानिक संघटनेने केली आहे. सरकार आणि बॅंकांकडून जेट एअरवेजला पंधराशे कोटींचा निधी मिळण्यासाठी संघटनेने ही मागणी केली आहे. जेट एअरवेजवर आलेल्या या संकटामुळे कंपनीतील २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

जेट एअरवेजमधील कर्मचाऱ्यांचे जानेवारीपासून वेतन थकीत आहे. कंपनीतील वैमानिकांनी सोमवारपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना कंपनी व्यवस्थापनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन रविवारी रात्री उशीरा मागे घेण्यात आले. "जेट एअरवेजला आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी स्टेट बॅंकेने पंधराशे कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विमानसेवा सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कंपनीतील २० हजार नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, अशी विनंती करण्यात आल्याची माहीती एनएजी संघटनेचे उपाध्यक्ष आदीम वालीयानी यांनी दिली.

सध्या आर्थिक स्थिती कोलमडलेल्या जेट एअरवेजची केवळ सहा ते सात विमाने सेवेत आहेत. इतर विमाने जमिनीवर आहेत. आर्थिक नियोजन कोलमडल्याने इतर विमाने जमिनीवरच आहेत. विमान दुरुस्ती करणारे कर्मचारी, तपासणीस यांनी वैमानिकांनी अनियमित वेतनामुळे 'उड्डाण बंद' आंदोलनाला पाठींबा दिला होता. वैमानिकांनी १ एप्रिलपासूनच संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने पंधरा दिवसांचा अवधी मागितल्याने हा संप मागे घेण्यात आला होता. सोमवारी पुन्हा हे आंदोलन सुरू केले जाणार होते. सोमवारी जेट एअरवेजतर्फे अंतिम निर्णयासंदर्भात बैठक घेतली जाणार आहे. त्या आधारावर कर्मचारी संघटना पुढील भूमिका ठरवणार आहेत. कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१८ रोजी शेवटचे वेतन मिळाले होते. कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121