यंदा पाऊसमान चांगले : आयएमडीचा अंदाज

    15-Apr-2019
Total Views | 118



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार यंदा अल निनोचा प्रभाव कमी राहणार असल्याने दक्षिण-पश्चिम पर्जन्यमान सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे यंदा पावसाची हजेरी समाधानकारक राहणार असल्याचे समजते.

 

कृषिप्रधान देश असल्याने भारतातील बहुतांश शेती ही पावसावरच अवलंबून आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात पाच टक्क्यांपर्यंत बदल होऊ शकतो. देशातील ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. भारत तांदुळ, गहू आणि कापूस उत्पादनात जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. पावसाच्या प्रमाणावर ही शेती अवलंबून आहे.

 

काय आहे अल नीनो ?

प्रशांत महासागरात पेरू देशानजीक समुद्री तटावरील उष्णतेमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांना अल नीनो म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत प्रशांत महासागरातील तापमानात वृद्धी होत आहे. अलनीनोमुळे समुद्रातील वाऱ्यांची दिशा बदलते. त्यामुळे पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात कमी पर्जन्यमान होते. याऊलट कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस होते.

 

काय होते स्कायमेटचे अनुमान ?

स्काईमेटने दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यात सरासरी ११० टक्क्यांहून जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121