नवी दिल्ली : एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय मंत्री जनरल वि.के. सिंह यांनी खोचक सवाल विचारला आहे. जनरल सिंह यांनी ट्विट करत “रात्री ३.३० वाजता डास जास्त झाले होते. मी त्यांना ‘हिट’ने मारले. आता किती डास मारले ते मोजत बसू कि निवांत झोपू, असा सवाल त्यांनी विचारला आहे.”
पुलवामातील भ्याड हल्ल्याचा सुड घेण्यासाठी भारतीय वायुदलाने बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केले होते. केंद्रीय मंत्री जनरल वि.के. सिंह यांनी आपल्या अंदाजात विरोधकांवर ताशेरे ओढले. भारतीय वायु दलाने केलेल्या कारवाईचे पुरावे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केले. नवज्योत सिंह सिद्धू यांनीही एअर स्ट्राईकवर सवाल उचलत ट्विट केले. एअर स्ट्राईकद्वारे दहशतवादी मारले कि, तुम्ही फक्त झाडे पाडली, असा सवाल विचारला होता.
या प्रकरणी वायुसेना प्रमुख बी.एस.धनोआ यांनी स्पष्टीकरण दिले होते. आम्ही आमचे लक्ष्य भेदतो, तिथले मृतदेह मोजणे आमचे काम नाही. एअर स्ट्राईकवरील हल्ल्यातील मृतांची आकडेवारी सरकार देईल, असे स्पष्टीकरण धनोआ यांनी दिले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधक जवानांच्या कतृत्वावर विरोधक शंका घेत असल्याचे म्हणत टीका केली होती. एअर स्ट्राईक पाकिस्तानात झाला पण त्याचा धक्का भारतातील काही जणांना बसला, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat