सोलापूर विमानतळाच्या अंतिम टप्प्यातील कामांचा आढावा

    20-Sep-2024
Total Views | 36
 
solapur airport
 
पुणे, दि. २० : (Solapur Airport)सोलापूर येथील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून या कामाचा आढावा नवी दिल्ली येथे एका बैठकीद्वारे घेतला. यावेळी विमानतळाच्या अंतिम टप्प्यातील कामाविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच कामाची स्थिती आणि तांत्रिक मुद्दे याचेही अवलोकन केले. उडान-आरसीएस रूट्स, एअरलाईन ऑपरेशन्स यावर बैठकीत चर्चा झाली. शिवाय सोलापूर-गोवा, सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-हैदराबाद या मार्गांवर सेवा सुरू करण्यासाठी विविध मुद्दे यावेळी चर्चिले गेले. लवकरात लवकर विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु असून सोलापूरकरांना लवकरच विमानसेवा मिळणार आहे. या बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूरच्या अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि नागरी हवाई वाहतूक विभागाचे सहसचिव आणि विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121