१ मार्चपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात होणार हे नवे बदल!

    28-Feb-2019
Total Views | 478

 


 
 
 
नवी दिल्ली : १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात अनेक नवीन बदल होणार आहेत. अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत. येत्या १ मार्चपासून आयकर विभाग इनकम टॅक्स सुरु करणार आहे. पीएनबी आणि इलाहाबाद बँकेचे गृहकर्ज स्वस्त होणार आहे.
 

इनकम टॅक्स रिफंड

 

 

आयकर विभाग इनकम टॅक्स रिफंड सुरु करणार असून, पॅन कार्ड जोडणी केलेल्या बँक खातेदारकांच्या खात्यात हा इनकम टॅक्स रिफंड थेट जमा होऊ शकतो. यावर्षी १ मार्चपासून आयकर विभाग ई मोडमधून रिफंड देईल.

 

पीएनबी बँक

 

 
 

पीएनबी बँकेचे गृहकर्ज ०.१० टक्के कमी झाले आहे. यापूर्वी पीएनबी बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर ८.५५ टक्के होता, आता हा व्याजदर ८.४५ टक्के झाला आहे.

 

स्टेट बँक ऑफ इंडिया

 
 
 
 

येत्या १ मार्चपासून तुम्हाला इलेक्टोरल बाँड खरेदी करता येतील. इलेक्टोरल बाँड अर्थात निवडणुकीचे बाँड. हे बाँड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या २९ शाखांमध्ये १ मार्चपासून उपलब्ध होऊ शकतात.

 

इलाहाबाद बँक

 
 

 
 

इलाहाबाद बँकेनेदेखील आपले गृहकर्ज स्वस्त केले असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. इलाहाबाद बँकेचे गृहकर्ज ०.१० टक्केने कमी झाले असून आता या बँकेचे नवे व्याजदर ८.१५, ८.२५, ८.४५, ८.५०, ८.६५ आणि ८.९५ टक्के आहेत.

 

आता एलआयसीही होणार डिजिटल!

 
 
 
 

सध्या डिजिटलायझेशनचे युग आहे. हे लक्षात घेऊन भारतीय जीवन बीमा निगम (LIC) आता डिजिटल होत आहे. १ मार्चपासून एलआयसीच्या पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीविषयीची सगळी माहिती एसएमएसवर उपलब्ध होणार आहे.

 
 
नेट परीक्षा 
 
 
 

 
 

यूजीसी नेट परीक्षेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया १ मार्च रोजी होणार आहे. यूजीसी नेटची परीक्षा येत्या २०, २१, २४, २५, २६ आणि २८ या तारखांना जून महिन्यात होणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121