तीन महिन्यात राममंदिर निर्माणासाठी समिती स्थापन करा - सर्वोच्च न्यायालय

    09-Nov-2019
Total Views | 68




मुंबई ( प्रतिनिधी) - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्यामधील रामजन्बामभूमीबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. विवादित जागा रामलल्लाचीच होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्या जागेवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय मुस्लिम पक्षकारांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

 
 

अयोध्या प्रकरणाबाबत अंतिम सुनावणी देताना विवादित जागा रामलल्लाचीच होती, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे विवादित जागेवर मंदिर बांधण्यासाठी एका ट्रस्टची निर्मिती करण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे तीन महिन्यामध्ये ही समिती स्थापन करण्याचे आदेश  न्यायालयाने सरकारला दिले आहेत. शिवाय मुस्लिम पक्षकारांना मशीद बांधण्यासाठी अयोध्येमध्येच पाच एकर जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे अयोध्येमधील वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुस्लिम पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायलायाने विविध मुद्यांबाबत स्पष्टीकरण दिले. बाबरीच्या ढाचा रिकामी जागेवर बांधण्यात आला नव्हता. त्याखाली एक वास्तू होती. ज्याचे अवशेष मंदिरांच्या अवशेषांशी मिळतेजुळते होते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121