नापाक कृत्य; बेपत्ता पोलिस अधिकाऱ्यांची हत्या!

    21-Sep-2018
Total Views | 11


 

श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांच्या तीन स्पेशल पोलीस अधिकाऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घडली असून हे दहशदवादी कृत्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निसार अहमद, फिरदौस अहमद आणि कुलदीप सिंग अशी या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे होती.


गेल्या काही दिवसांपासून काश्मीर परिसरात जवान आणि पोलिसांच्या हत्यांचे प्रमाण वाढले आहे. एकटा जवान दिसला की, त्या जवानाला घेरून त्यांची हत्या केली जात असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानाची निर्घृण हत्या केली होती.

 

मागील काही दिवसांपासून दहशदवाद्यांनी पोलिसांना लक्ष केल्याचे दिसत आहे. हिजबुल मुजाहीदीन या दहशतवादी संघटनेने पोलिसांनी राजीनामे द्यावेत अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जा अशी धमकी देखील दिली होती. त्यानंतर काही पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. नंतर त्यांना सुखरूप सोडण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर तीन बेपत्ता पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह आढळल्याने काश्मीर पट्ट्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121