या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलच जबाबदार : शरद पवार

    25-Jul-2018
Total Views | 21



मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आज मराठा आंदोलनाची परिस्थिती बिघडली असून सध्या परिस्थितीला ही मंडळीच जबाबदार आहेत, अशी वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे. पवार यांनी आपल्या सोशल मिडियावरून ही प्रतिक्रिया दिली असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लवकरात लवकर आंदोलनात सहभागी झालेले महत्त्वाच्या घटकांशी चर्चा करावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

मराठा समाजातील वंचित तरुणांनी शांततेच्या मार्गाने आतापर्यंत त्यांच्या आरक्षणासह इतर मागण्या मांडल्या आहेत, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला कधीही धक्का लागू दिलेला नाही. इतके करून देखील सरकारकडून त्यांच्या अस्वस्थतेची दखल न घेतल्यामुळे काहींनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. परंतु तरी देखील सरकारने याकडे लक्ष देता मुख्यमंत्री आणि त्यांची मंत्री विशेषतः चंद्रकांत पाटील हे या विषयाचे गांभीर्य समजण्याऐवजी चिथावणीदायक विधाने करताना आढळत आहेत, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीला ही मंडळीच जबाबदार आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे.

तसेच मराठा समाजाची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर झाली असून याकडे सरकारने आता गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले आहे, असे पवारांनी म्हटले आहे. राज्य सरकारने तामिळनाडू राज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन न्यायालयासमोर आपली बाजू मांडली पाहिजे, तसेच या दरम्यान मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न पोहोचवता आणि ओबीसी-मुस्लीम समाजाचा विचार करूनच पाऊल उचलावे, असा सल्ला देखील पवारांनी दिला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121