कान्हदेशच्या कन्येचा गौरव

    23-Mar-2018
Total Views | 12
 

जळगाव :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत केली. यानिमित्ताने खान्देशवासियांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी मान्य झाली आहे. कान्हदेशच्या कन्येचा हा गौरव असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. दरम्यान, या घोषनेनंतर सर्वत्र जलौष करण्यात येवून सरकारचे अभिनंदनही करण्यात आले.
 
 
बहिणाबाई उद्यानात आतिशबाजी
युवाशक्ती फाउंडेशन तसेच लेवा युवा महासंघ तसेच विविध संघटनांतर्फे बहिणाबाई उद्यानात बहिणाबाईंच्या पुतळ्याला हार अर्पण करुन आतिशबाजी करण्यात आली.
 
 
महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर सुनील पाटील, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती नितीन बरडे, युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, विश्‍व हिंदू परिषदेचे ललित चौधरी, गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, डॉ.स्नेहल फेगडे, विनोद देशमुख, मुविकोराज कोल्हे, हरीश कोल्हे, प्रा.निलेश चौधरी, किशोर भोसले, राजेश वारके, शामकांत सोनवणे, सुनील महाजन इ. उपस्थित होते. उपस्थितांना पेढे वाटत आनंद व्यक्त करण्यात आला. युवाशक्तीचे अध्यक्ष मनजित जांगिड, विनोद चौधरी, उज्वला वर्मा आदींनी सहकार्य केले.
 
 
 
बहिणाबाईंचे काव्य सर्वमान्य, वादातीत राहिलेले आहे. या नामकरणाचे त्यांच्या थोर व्यक्तिमत्त्वाचा एकमुखाने व उचित सन्मान झाला आहे, याचे श्रेय सार्‍यांना दिले पाहिजे. अनेक वर्षापासून अनेक संस्था आणि मान्यवरांकडून याबाबत मागणी आणि सतत पाठपुरावा होत होता. लेवा समाजाच्या महाअधिवेशनातही ठराव पारित झाला होता. जनमताचा रेटा आणि इच्छेची ही फलश्रुती आहे. या निर्णयाबद्दल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदनही केलेले आहे.
- आ.एकनाथराव खडसे,
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री
मानवधर्माच्या पुरस्कर्त्या बहिणाबाई चौधरी या लेवा समाजबांधवांच्या अस्मितेचे, अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांचे उमविला नाव द्यावे आणि त्यांच्या लेवा गणबोलीतील सहजसुंदर, उत्स्फूर्त काव्यामधील चिरंतन मुल्यांचे जतन, संवर्धन व्हावे, अशी आमची प्रदीर्घ काळापासून मागणी होती. पाडळसे येथे गेल्या ४ फेब्रुवारीला झालेल्या महाअधिवेशनात तसा ठरावही आम्ही केला होता. या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन!
- रमेश विठू पाटील,
कुटुंब नायक, भोरगाव लेवा पंचायत, पाडळसे ता.यावल

अतिशय स्तुत्य आणि स्वागतशील तसेच सृजनशीलता, संवेदनशीलता दर्शक हा निर्णय आहे. जीवनाचे तत्त्वज्ञान आपल्या पारिवारिक, बोली भाषेत सांगणार्‍या बहिणाबाईंची साहित्यिक उंची उत्तुंग आहे, त्यांचे नाव विद्यापीठाला देण्याची मागणी वेळोवेळी सिनेटमध्ये आम्ही केलेली आहे, सिनेट सदस्या मनीषा चौधरी- खडके यांनी गेल्याच महिन्यात याबाबत कुलगुरुंना पत्रही दिलेले होते. एकमताने निर्णय झाला, हेही स्वागतार्हच.
- दिलीप रामू पाटील,
राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य.
 
 
‘उमवि’ला बहिणाबाईंचे नाव देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय संपूर्ण खान्देशवासियांसाठी अभिमानाचा असून, कान्हदेशकन्या बहिणाबाईचा हा सर्वाधिक सन्मानाचा गौरव आहे. बहिणाबाईंच्या परिवाराशी जैन उद्योग समूह अगोदरपासून जुळलेला आहे. जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी दूरदृष्टीने २००७ मध्ये बहिणाबाई मेमोरिअल ट्रस्टची स्थापना केली. बहिणाबाईंचे साहित्य कालातीत असून ते समाजासाठी सदैव मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समूह, जळगाव
खान्देशातील लेवा समाजबांधव आणि अ.भा.लेवा युवा महासंघाने सातत्याने याबाबतही मागणी केली होती आणि पाठपुरावाही केला होता. ४ फेब्रुवारीला पाडळसे येथे ५० हजारावर समाजबांधवांचे महाअधिवेशन झाले असता समारोपप्रसंगी मी स्वत: या मागणीचा ठराव मांडला होता. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी याबाबत पाठपुरावा केला, त्यांचे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार.
- विष्णू भंगाळे, सिनेट सदस्य.
 
 
गेल्या १०-१२ वर्षापासून मी आणि माझे काही मित्र या मागणीसाठी आग्रही होतो, वेळोवेळी आणि लेवा समाजाच्या महाअधिवेशनातही सुरवातीला एकट्याने आम्ही याबाबत लक्ष वेधले होते. तसेच यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते. त्याला समाजातून मोठ्या प्रमाणातून प्रतिसाद देखील मिळाला होता. या पाठपुराव्याच्या आणि अनेकांच्या सहकार्याची, मागणीची ही फलश्रुती आहे.
- मुविकोराज कोल्हे, जळगाव.
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा

भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा

(Dilip Doshi) भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी २१ जूनला रात्री लंडन येथे वयाच्या ७७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दिलीप दोशी हे केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटूच नव्हते, तर त्यांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी समालोचक म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या स्पष्ट, रसाळ आणि अभ्यासपूर्ण भाष्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये त्यांची क्रेझ होती. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच क्रिकेट जगतातून शोक व्यक्त केला जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121