खेळ आणि संस्कृतीच्या माध्यमातून व्यसनांना संपविले : अरिबाम शर्मा

    26-Nov-2018
Total Views | 24



मुंबई : “मणिपूरमधील तरूणांना व्यसनाधिनतेने ग्रासले होते. व्यसनांमुळे त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. परंतु, खेळ आणि संस्कृतीच्या माध्यमातून व्यसनांना संपविले,” असे मत सामाजिक कार्यकर्ते अरिबाम ब्रजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले. ‘माय होम इंडिया’च्यावतीने दिला जाणारा यंदाचा ‘वन इंडिया पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते अरिबाम शर्मा यांना नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी शर्मा बोलत होते. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, माय होम इंडियाचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यावेळी उपस्थित होते.

 

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये शिक्षण, संस्कृती, खेळ आणि आरोग्य या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा ‘वन इंडिया पुरस्कारा’ने गौरव केला जातो. एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी बोलताना शर्मा म्हणाले की, “मणिपूरमधील तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेली होती. त्यामुळे त्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. व्यसनाला संस्कृतीशी आणि खेळाशी जोडले, जेणेकरुन या तरुणांना व्यसनांचा विसर पडला. अशाप्रकारे आम्ही खेळ आणि संस्कृतीच्या माध्यमातून व्यसनांना त्यांच्या जीवनातून हद्दपार केले. परंतु, हे काम करताना जेव्हा मी घरी जायचो, तेव्हा माझी मुले झोपलेली असायची, तर सकाळी ते उठण्यापूरर्वीच घर सोडावे लागायचे. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना वेळ देता आला नाही,” अशी खंतही यावेळी शर्मा यांनी बोलून दाखविली.

 

नागालँड, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांत गुणवान व्यक्तींनी आपला अमूल्य वेळ देण्याची गरज असल्याचे मत नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. “आपल्याला केवळ गांधी आणि गांधीच शिकविले जाते, परंतु त्यापलीकडेही काहीजणांचे कार्य आहे. त्याची तुलना होऊ शकत नाही. अरिबाम शर्मा हे त्यापैकीच एक आहेत,” असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी काढले. “मुंबईत रोजच काही ना काही कार्यक्रम होत असतात, परंतु ‘वन इंडिया’चा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम मुंबईकरांच्या मनाला स्पर्श करणारा ठरेल,” असे यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121