तलाठी नेमणुकीसाठी तहसीलदारांची टाळाटाळ

    19-Nov-2018
Total Views | 22

ग्रामस्थांना पाचोरा तहसीलदार कापसे यांची दमबाजी

पाचोरा
तालुक्यातील आखतवाड येथे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तलाठी गावात येत नसल्याने ग्रामंस्थांना सर्व कामांसाठी लागणारे कागदपत्रे घेण्यासाठी 3 ते 4 कि.मी. अंतरावर पायपीट करत नेरी येथे चकरा माराव्या लागतात.
 
आखतवाडे येथे किमान 2 दिवस तरी तलाठी यांनी यावे आबालवृध्दाचे कामे व्हावे यासाठी ग्रामंस्थांनी 3 ऑक्टोबरला रोजी तालुक्याचे तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी नायब तहसीलदार कडणोर, तहसीलदार बी.ए.कापसे यांनी लगेच आठवड्यातून 2 दिवस तलाठी आखतवाडे येथे येतील असे सांगितले होते.
 
परंतु दिड महीना ऊलटुन देखील गावात तलाठी येत नसल्याने याबाबत चौकशी करण्यासाठी आखतवाडे येथील काही ग्रामस्थांनी मंगळवारी पाचोरा तहसिल कार्यालय गाठले व पाचोरा तहसीलदार बी.ए. कापसे यांना भेटुन तक्रार निवारण झाली नसल्याचे सांगितले.
 
नंतर तहसीलदार कापसे यांनी चिडले व ग्रामंस्थांचे समाधान न करता तुम्ही मला शिकवु नका, ते माझे काम आहे. काय करायचे ते मी बघेल अशी मुजोर दादागिरीची भाषा वापरून ग्रामंस्थांना सर्वांसमक्ष अपमानीत केले.
 
त्यामुळे पाचोरा तहसिल प्रशासनाच्या मुजोरीपणाचा आखतवाडे ग्रामस्थांनी तिव्र शब्दात निषेद केला असुन लवकरच वरिष्ठ अधिकारी कडे याबाबत सविस्तर तक्रार करुन संबधीत प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठांनी पाचोरा तहसिलदार बी.ए.कापसे यांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज मागवून योग्य ती कार्यवाही करावी. अशीही मागणी संबधीत ग्रामस्थांनी केली आहे.
 
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकरी, ग्रामंस्थांना तलाठी यांच्या कडील पावलोपावली 7/12 ऊतारा, खाते ऊतारा, रहीवाशी दाखले, उत्पन्नाचे दाखले असे अनेक विविध कागदपत्रे लागत आहेत. परंतु तलाठी गावात येत नसल्याने ग्रामस्थ, शेतकरी यांना नेरी येथे जावे लागत आहे.
 
म्हणुन याबाबत संबंधित वरीष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन आखतवाडे ग्रामंस्थांची समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करुन आखतवाडे ग्रामस्थांना न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी ‘तरुण भारत’ शी बोलतांना केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121