धक्कादायक! जावयानेच संपवले कुटुंब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून ४ जणांची हत्या झाली आहे. धुमाळ कुटंबात हे हत्याकांड घडले असून या कुटंबातील जावयानेच या हत्या केल्या असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रदीप जगताप असे त्याचे नाव असून त्याचे लग्न धुमाळ कुटंबातील दोन मुलींपैकी एका मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते.
 

कौटुंबिक वाद झाल्यावर रागाच्या भरात प्रदीपने घरातील यंत्रमागाच्या लाकडी साधनाने कुटंबातील सदस्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमुळे प्रदीपच्या सासूबाई आणि मेव्हणी यांचा जागीच मृत्यू झाला. प्रदीप यांची पत्नी आणि मेव्हणा जखमी झाले होते. त्यांना सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. हे हत्याकांड करणारा प्रदीप जगताप हा त्यानंतर फरार झाला होता. पण त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून प्रदीपला अटक करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@