कोल्हापूर सुखावले! राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

    10-Sep-2023
Total Views | 56

radha nagri


मुंबई :
मागील संपूर्ण महिना दडी मारून बसलेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा सुखावला आहे.

पावसामुळे अनेक धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होण्यास सुरुवात झाली असून अनेक धरणे संपूर्ण क्षमतेने भरली आहेत. कोल्हापूर जिल्हा सुजलाम होण्यात मोठे योगदान असलेल्या राधानगरी तालुक्यातील धरणांचे खूप आहे. राधानगरी तालुक्यात 'राधानगरी', 'दूधगंगा' व 'तुळशी' हे तीन मोठे प्रकल्प आहेत. या तीन प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ३७.२२ टीएमसी आहे.

राधानगरी तालुक्यात आतापर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस झाला होता. परंतु गेल्या २/३ दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121