Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सं
Read More
Iftar Party लोकसभा निवडणुकीत सलग तीन वेळा काँग्रेसचा (Congress) पराभव झाला. मात्र आजही ते तुष्टीकरणाचे राजकारण करण्यास कोणतीही एक कसर सोडताना दिसत नाहीत. हिंदूंच्या संघर्षाचे प्रतीक असलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा आणि महाकुंभापासून दूर राहिलेले काँग्रेस नेतृत्व आता आनंदाने इफ्तारमध्ये सहभागी होत आहेत. मोहम्मद अली जिना यांनी गांधी कुटुंबाच्या प्रत्येक कृतीवर गदारोळ करणारी काँग्रेस आता इफ्तारवर मूग गिळून गप्प बसली आहे.
नुकताच महाकुंभकाळात अनेक श्रद्धाळूंनी कुंभस्नानाचा अनुभव घेतला. या कुंभस्नानाचे महत्त्व हिंदू धर्मात विशद केले आहेच. तरीही अनेकांनी लौकिक ज्ञानाच्या माध्यमातून अलौकिक अशा स्नानानुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच. त्यापैकी अनेकांचे प्रश्न कुंभस्नानाने काय लाभ होणार आहे? अशा आशयाचेच होते. मात्र, प्रयागमधील त्रिवेणी संगमावर केलेल्या स्नानाचे महात्म्य आदि शंकराचार्य त्यांच्या त्रिवेणी स्तोत्रातून विशद करतात. त्यांच्या या त्रिवेणी स्तोत्राचा हा भावानुवाद...
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
Beef उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नुकतीच महाकुंभची सांगता झाली आहे. यानंतर आता काही लोक जातीय हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या घराबाहेर गोवंशी प्राण्यांचे मांस फेकून उन्माद करत आहेत. गोवंशी मांसाचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले आढळले आहेत. शहरातील दरियाबाद पोलीस ठाण्याजवळील असणाऱ्या रस्त्यावर आणि नाल्यात एका गोवंशी वासराचे धड पडल्याचे आढळले आहे.
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी, अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मी देवभक्ती आणि देशभक्ती म्हणजेच अनुक्रमे दैवी शक्तींची भक्ती आणि राष्ट्राची भक्ती याबाबत विचार मांडले होते. प्रयागराज येथील महाकुंभात देवी आणि देवता, संत, महिला, लहान मुले, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि जीवनाच्या सर्व स्तरांवरील लोक एकत्र आले. देशामध्ये जागृत झालेल्या जाणिवेचे दर्शन यावेळी घडले. या पवित्र पर्वासाठी सुमारे 140 कोटी भारतीयांच्या भावना एकाच जागी, एकाच वेळी एकवटल्या होत्या, असा हा एकतेचा महाकुंभ होता.
महाकुंभ हा युगपरिवर्तनाचा संकेत असून त्याने भारताच्या विकास प्रवासात एका नवीन अध्यायाचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एकता का महाकुंभ युग परिवर्तन की आहट या विशेष ब्लॉगमध्ये केले आहे.
कुंभमेळ्याला जाणार्या श्रद्धाळूंची वाहतुककोंडीबाबत काही तक्रारच नाहीच. सर्व भेदाभेद विसरून कोट्यवधी हिंदू एकत्र येऊ शकतात, ही गोष्टच विरोधकांच्या पचनी पडत नाही आहे. त्यातून एका योगी साधूने, इतक्या भव्य प्रमाणात एका हिंदू सणाचे भव्य आणि यशस्वी आयोजन केल्यानेही विरोधकांची झोप उडाली आहे.
Mahakumbh Mela 2025 प्रयागराज महाकुंभमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी डुबकी न लावल्याने ते हिंदू नसल्याचा दावा त्यांनी केला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिपादन केले आहे. ते महाकुंभच्या शेवटच्या दिवसी दि : २७ फेब्रुवारी २०२५ रोजी बोलत होते. करोडो हिंदूंनी महाकुंभात डुबकी मारली मात्र, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी डुबकी न मारल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली.
झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असले, तरी त्यास अद्याप यश आलेले नाही. झाकीर नाईकविरुद्ध ठोस पुरावे देण्याची मलेशिया सरकारची मागणी आहे. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने झाकीर नाईकविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले असून, त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेतच.
Naziya Khan भाजप पक्षाच्या प्रवक्त्या नाझिया इलाही खान (Naziya Khan) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रयागराज महाकुंभला जात असताना हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी नाझिया यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचे वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. त्यांनी त्यांच्या वाहनाचा फोटो सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. नाझिया मुस्लिम असल्या तरीही त्या हिंदू धर्माचे समर्थन करतात.
हिंदूना डावलून सत्तेसमीप जाता येत नाही, याची प्रचिती आल्याने पुरोगाम्यांकडून आस्थेचा बाजार मांडण्याचे उद्योग सुरू आहेत. खा. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही महाकुंभात अमृतस्नान करून परतल्यानंतर आस्थेचा बाजार भरवला आहे. त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा घाट रोहित ब्रिगेडकडून घातला जात आहे.
हिंदू संस्कृतीवर टीका करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी डाव्या कंपूची असते. त्यासाठी ते खोटी माहितीदेखील इतिहास म्हणून बेदरकारपणे प्रसिद्ध करतात आणि त्यांची इकोसिस्टम त्यांची लगेचच री ओढते. मात्र, आता जनता जागृत झाली आहे, डाव्यांच्या प्रत्येक आरोपाला संदर्भासहित उत्तर दिले जात आहे. महाकुंभबाबतही डाव्या इकोसिस्टीमने असेच अपप्रचाराचे प्रयत्न करून पाहिले, पण त्यात ते यंदा सपशेल अपयशी ठरले.
Mahakumbh 2025 नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातावर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी कुंभमेळ्याबाबत गरळ ओकली आहे. महाकुंभमेळ्यावर त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांनी या अपघातासाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे.
Mahakumbh 2025 उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्ह्यात महाकुंभ (Mahakumbh 2025) सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला परदेशातून भाविक येत आहेत. अशातच या सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये १० भाविकांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गृहविभागाच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत गृहविभागाची ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली दौऱ्यानंतर फडणवीस हे प्रयागराजला रवाना होणार आहेत.
महाकुंभ ही आपल्या देशाची आस्था असून ती बघून जगभरातील लोक अचंबित झाले आहेत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी ते प्रयागराज येथे दाखल झाले असून त्यांनी सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले.
जगातील अनेक देशांच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षाही, अधिक लोकांनी सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात स्नान केले आहे. भारत सरकार इतक्या प्रचंड जनसंख्येचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करू शकते, हे जगाने पाहिले. अनेक देशांतील लोकही यात सहभागी झाल्यामुळे, जगालाही सनातन धर्माचे विश्वरूपदर्शन झाले आहे.
पवित्र कुंभमेळ्याच्या महापर्वामध्ये ‘प्रयागराज महाकुंभ आयोजन समिती’ व उत्तर प्रदेश सरकारने अनुसूचित जातीजमाती व भटके-विमुक्त समाजातील संत, भागवतकार, महाराज यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले. इतिहासामध्ये प्रथमच भटके-विमुक्त समाजाच्या संतांना या प्रकारे कुंभामध्ये विशेष निमंत्रण देऊन बोलावले होते. जातीपातीपलीकडे जाऊन संतमहंत हे सर्व हिंदू समाजाचे संतमहंत आहेत, हा संदेश यामध्ये होता. या महत्त्वाच्या घटनेच्या अनुषंगाने ‘भटके- विमुक्त विकास परिषदे’चा महाराष्ट्र प्रांत प्रमुख म्हणून भटके-विमुक्त समाजाच्या सद्यस्
PM Narendra Modi) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसला भेट देणार आहेत, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना सर्वस्वी दुर्दैवीच. पण, त्यावरुन राजकीय डाव साधत, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा अखिलेश यादवांनी केलेला प्रकार त्याहूनही अश्लाघ्य! पण, अखिलेश यांच्या पिताश्रींच्याच आदेशावरुन कारसेवकांवर केलेल्या बेछूट गोळीबारातून शरयू नदी बलिदानाच्या रक्ताने लाल झाली होती. त्या रक्ताळलेल्या शरयूची आठवण तुम्हाला येते का हो अखिलेश?
Mahakumbh 2025 प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी (Mahakumbh 2025) आलेल्या महिला भाक्तांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बरेलीमधील कट्टरपंथी तरुणाविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साबीर हुसैन असे आरोपी तरुणाचे नाव असून तो बरेलीमधील मीरगंजचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे शुक्रवारी सांगितले.
Mahakumbh Mela 2025 उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात २५ ते ३० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेनंतर आता महाकुंभामध्ये दुसऱ्यांदा आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवार ३० जानेवारी २०२५ रोजी सेक्टर २२ मध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या असून आग शमवन्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Mahakumbh 2025 मौनी अमावस्येला प्रयागराजच्या महाकुंभामध्ये वाढलेल्या गर्दीमुळे भाविक भक्तगणांमध्ये चेंगराचेंगरी झाली. बुधवारी २९ जानेवारी रोजी पाहटे १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविक हे जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. या घडलेल्या घटनेमध्ये आमचे लक्ष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस
लखनौ : प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली. यामध्ये घडलेल्या या दुर्घटनेत काही माणसांना आपला जीव गमवावा लागला तर काही जण जखमी झाले. या घडलेल्या प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi about Mahakumbh Accident ) यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली हळहळ व्यक्त केली आहे.
Mahakumbh Mela 2025 उत्तर प्रदेशातील प्रयागरामध्ये सध्या महाकुंभमेळा (Mahakumbh Mela 2025) सुरु आहे. यासाठी देशातूनच नाहीतर जगभरातून भाविकांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. मात्र या महाकुंभमेळ्यात २८ जानेवारी २०२५ रोजी मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारात दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने भाविक भक्तगण हे जखमी झाले आहेत. तर काहीजण मृत्यू पावल्याचे बोलले जात आहे. मात्र अशातच आता सोशल मीडियावर अहिंदू कट्टरपंथींनी घडलेल्या घटनेची खिल्ली उडवली आहे.
Mahakumbh मेळ्यात प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्येच्या पर्वणीमध्ये १० कोटींहून अधिक हिंदू अमृतस्नान करणार आहेत.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ ( Maha Kumbh Mela ) सुरु आहे. त्यासाठी लाखो भाविक येथे जात आहेत. त्यातच आता सरकारने आकडेवारी जारी केली आहे. २७ जानेवारी रोजी ४६.६४ लाखाहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे. तर २६ जानेवारीपर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये श्रद्धेची डुबकी घेतली. उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान अमित शाह महाकुंभमध्ये सहभागी होणार आहेत.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या पराभवानंतर, काँग्रेस पक्ष निराशेच्या गर्तेत अडकला असल्याचं बघायला मिळातं आहे. पक्षाची पुढची भूमिका काय असेल यापेक्षा दुसऱ्यांची उणीदुणी काढण्यातच काँग्रेस धन्यता मानत असल्याचं बघायला मिळतं आहे. अशातच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केवळ राजकारणासाठी पवित्र महाकुंभवर टीका केली आहे. भारत सरकार गरीबांकडे लक्ष्य देण्याऐवजी महाकुंभवर एवढा पैसा का खर्च करत आहे असा सवाल खर्गे यांनी केला.
Mahakumbh Mela 2025! मध्ये लाखो भक्तांचा जनसमुदाय लोटला गेला आहे. उद्योगपतींपासून ते परदेशी भाविकांनी महाकुंभाला आपली उपस्थिती दर्शवली होती. अशातच आता महाकुंभमेळ्यात क्रीडापटूंची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. दि : २६ जानेवारी २०२५ रोजी महाकुंभ मेळ्यात माजी क्रिकेटपटू सुरैश रैनाने पवित्र स्नान केले. त्यानंतर महिला बॉक्सर मेरी कोम यांनीही पवित्र स्नानाचा आनंद घेतला आहे.
Mahakumbh Mela 2025 काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी प्रयागरामध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत असभ्य टिप्पणी केली आहे. महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये अस्वच्छता निर्माण होईल असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. याचसोबत त्यांनी दावा केला की, १२ वर्षातून एकदा महाकुंभमेळा साजरा केला जातो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग आजार पसरला जात असल्याचे सांगितले जाते आहे.
भारतातील महाकुंभची चर्चा अगदी सातासमुद्रापारही असून, विदेशी पर्यटकही जगातील या सर्वांत भव्यदिव्य अशा अध्यात्मिक पर्वणीत सहभागी झाले आहेत. शिवाय एक भगवेधारी राज्यशकट कसा हाकणार, असा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून खोचक प्रश्न उपस्थित करणार्यांनीही महाकुंभतील ( Maha Kumbha ) प्रशासकीय व्यवस्था, तत्परता पाहून तोंडात बोटे घातली आहेत.
Mahakumbh Mela 2025 उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा २०२५ (Mahakumbh Mela) सुरू आहे. यामुळे अनेक भाविक भक्तगण याठिकाणी सामिल झाले आहेत. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांनी महाकुंभाला अंधश्रद्धा असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता महाकुंभातील नागाबाबा प्रचंड संतापले आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये काही लोक महाकुंभमेळा बदनाम करत असल्याचे बोलले जात आहे.
महाकुंभमेळ्यामुळे संघटित होत असलेले हिंदू मन लक्षात घेऊन पूर्वश्रमीचे पापक्षालन करण्याच्या हेतूने, गंगासागर मेळाव्याच्या जाहिराती देत हिंदूंसाठी पश्चिम बंगाल सरकार किती कष्ट घेते हे दाखवण्याचा उद्योग ममता बॅनर्जी ( Mamata Government ) यांनी चालवला आहे. मात्र, देशातील समस्त हिंदू संत ‘काय भुललासी वरलिया रंगा’ ही चोखोबांची शिकवण मनात दृढ धरून आहेत.
महाकुंभमेळ्यात, ( Maha Kumbhamela ) आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रयागराज येथे पहिले अमृतस्नान होत आहे. तब्बल २५ हजार कोटींची उलाढाल या महाकुंभमेळ्यात होईल, असा अंदाज आहे. अर्थकारणाच्या सर्व घटकांना चालना देणारा हा महाकुंभ आहे. त्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम येणार्या काळात दिसून येतील.
Mahakumbh उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. कारण महाकुंभ २०२५ (Mahakumbh) ला सुरूवात झाली आहे. अशातच याठिकाणी अनेक परदेशी नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. तसेच काही सोशल मीडिया माध्यमांवर सक्रिय असणारे डिजीटल क्रिएटल असणाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या मथळ्यासाठी महाकुंभ २०२५ चे अनेक चित्रे, दृष्य, व्हिडिओ टीपत आहेत. अशातच आता युट्यूबर्सनेही याठिकाणी सामिल झाले आहेत महाकुंभ परिसरामध्ये दाखल झाले आहेत.
मुंबई : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज ( Prayagraj Mahakumbh ) येथे आजपासून ‘महाकुंभ’ला सुरुवात होत आहे. दि. १३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘महाकुंभ’ होत आहे. यासाठी जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सुमारे ४० कोटी भाविक प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता आहे. आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले अमृत स्नान होत असून दि. १४ जानेवारी मकर संक्रांती, दि. २९ जानेवारी मौनी अमावस्या, दि. ३ फेब्रुवारी बसंत पंचमी, दि. १२ फेब्रुवारी माघी पौर्णिमा, दि. २६ फेब्रुवारी महाशिवरात्री या अमृत स्नानाच्या एकूण सहा तारखा
Mahakumbh Mela अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी हे पुढील आठवड्यात प्रयागराजमधील होणाऱ्या महाकुंभमेळ्यामध्ये महाप्रसादासाठी हातभार लावता येणार आहे. त्यांच्यासोबतच इस्कॉनही महाप्रसादासाठी मदत करणार आहे. दोन्ही संस्था १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीमध्ये महाकुंभमेळ्यामध्ये संपूर्ण कालावधीत भाविकांना महाप्रसादाची सेवा देणार आहेत.
Mahakumbh Mela हा १२ वर्षानंतर भारतात भरत असतो. हिंदू धर्माच्या या मेळाव्यासाठी अनेक काळापासून सुरू असलेल्या परंपरेत मनुष्य हा एकमेकांशी जोडला गेला जातो. यंदाच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळावा भरणार आहे. महाकुंभ मेळावा २०२५ मध्ये जगातील अनेक श्रद्धाळु आपली उपस्थिती दर्शवतात. अशातच आता अॅप्पल कंपनीचे सह संस्थापक स्टिव्ह जॉब यांची पत्नी लॉरेन पॉवेलही दि: १३ जानेवारी २०२५ रोजी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. एका मासिकाने याप्रकरणाची माहिती दिली आहे.
महाकुंभ म्हणजे हिंदू धर्माच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा महामेळावा. कोट्यावधी भाविक या सोहळ्यामध्ये सामील होतात. सामान्य माणसांपासून ते अनेक दिग्गज मंडाळी या महामेळाव्यात देश विदेशातून सामील होत असतात. अशातच आता माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार अॅपल कंपनीचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल या देखील उपस्थित राहणार आहे. जगातील अत्यंत प्रभावशाली असलेल्या माणसांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे. या संदर्भात स्वामी कैलाशनंदजी महाराज यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दि. १३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्या महाकुंभ मेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. हा महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम ठरणार आहे. या कुंभमेळ्यामध्ये विविध साधू-संत, महामंडलेश्वर यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य भाविक प्रचंड संख्येने सहभागी होणार आहेत.
सनातन हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असलेला महाकुंभमेळा येत्या १३ जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी महाकुंभमेळ्याचे निमंत्रण दिले.
बुधवारी 'स्टार्टअप महाकुंभ 'या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप हा देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महत्वाचा कणा असेल हे महत्वपूर्ण विधान केले आहे. बुधवारी सकाळी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्टार्टअपची महती त्यांनी समजावून सांगितली.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पेनेतून शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत दिनांक २६ जानेवारी २०२४ पासून मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी पारंपरिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांचे अंतिम सामने २१ फेब्रुवारी रोजी होणार असून त्या संदर्भात मुंबई उपनगर
लुप्त होत चाललेल्या शिवकालीन खेळांचा वारसा, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी कौशल्य विकास मंगलप्रभात लोढा यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे' आयोजन केले आहे. शुक्रवारी वरळीतील जांभोरी मैदानावर राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन पार पडले. यावेळी मंत्री लोढांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढील वर्षी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर येत्या दि. १ व २ डिसेंबर रोजी वाराणसी येथे दोन दिवसीय पर्यावरण कुंभ आयोजित करण्यात आला आहे.