नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यावर कारवाई! राऊतांची पोटदुखी

    16-Apr-2025
Total Views |
 
Sanjay Raut
 
नाशिक : नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून काठे गल्ली येथील अनधिकृत सातपिर बाबा दर्गा हटवण्याची मोहिम मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्री सुरु करण्यात आली. मात्र, यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना पोटदुखी सुरु झाल्याचे दिसते.
 
नाशिकमध्ये मंगळवारी सातपीर दर्गा हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. महापालिकेने सातपीर दर्ग्यास यापूर्वीच अनधिकृत घोषित केले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार, १६ एप्रिल रोजीदेखील ही कारवाई सुरुच होती. तर दुसरीकडे, याच दिवशी नाशिकमध्ये उबाठा गटाचे निर्धार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
 
 
त्यामुळे अनधिकृत दर्ग्यावरील कारवाईवरून संजय राऊतांना पोटशुळ उठल्याचे दिसले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "नाशिक शहरात आज दर्गे हटाओ मोहिम सुरु केल्याचे मला समजले. दर्ग्यांवर बुलडोजर फिरवणार आहे. गोंधळ निर्माण व्हावा आणि या शिबीरावरचे लक्ष दुसरीकडे जावे म्हणून दर्ग्यांवर किंवा मशिदींवर बुलडोजर चालवायचा. हे कसले लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. ही कारवाई नंतर करु शकत होते. पण आजचाच दिवस निवडला. कारण आज इथे उद्धव ठाकरे येत आहेत. आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नेते इथे आलेले आहे. आज नाशिकमध्ये महत्त्वाचे शिबिर आणि अधिवेशन होत असल्याने आजचा दिवस निवडला. पण यामुळे या शिबिरावर काहीही परिणाम होणार नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ०२ जून रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष “रक्तदान उपक्रम” सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसा..

मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५; माध्यमविश्वातील हिरक महोत्सव!

मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५; माध्यमविश्वातील हिरक महोत्सव!

प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात. माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे. या परीसरूपी हातांचं कौतुक होणं आज गरजेचं आहे. माध्यमांच्या आजच्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121