फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत पालिका आणि पोलिस प्रशासनाला उचित सूचना देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार कालिदास कोळंबकर यांनी उपस्थित केला प्रश्न

    11-Mar-2025
Total Views |
 
Kalidas Kolambkar Devendra Fadanvis
 
मुंबई : आमदार कालिदास कोळंबकर यांनी सोमवार, १० मार्च रोजी विधानसभेत मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला उचित सूचना करण्याचे आश्वासन दिले.
 
"आज सगळे फेरीवाले रस्त्यावर लढत आहेत. त्यांना का त्रास दिला जातो? सुरुवातीला त्यांना कायदेशीरपणे लायसन्स देण्याचा प्रयत्न होता. पण फेरीवाल्यांना लायसन्स का देत नाहीत हासुद्धा प्रश्न आहे," असा प्रश्न कालिदास कोळंबकर यांनी उपस्थित केला. यावर आपण आज टाऊन वेडिंग ॲप करत आहोत. मुंबईतील फेरीवाल्यांना दहा, वीस हजार रुपये कर्जही दिले आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. त्यानंतर फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत माहिती घेऊन उचित सूचना महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.