नारायण राणेंचा गौप्यस्फोट, म्हणाले, "बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंसाठी माझ्याकडून शब्द..."

    02-Apr-2024
Total Views | 166

Rane & Thackeray 
 
मुंबई : मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंसाठी माझ्याकडून एक शब्द घेतला होता, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत इंडी आघाडीच्या सभेत भाजपवर केलेल्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.
 
नारायण राणे म्हणाले की, "मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एक-दीड महिन्यानंतर बाळासाहेबांचा मला फोन आला. त्यांनी मला एक शब्द मागितला. ते म्हणाले की, उद्धवबद्दल कधी वाईट विचार करु नकोस. मी त्यांना म्हटलं की, उद्धवच नाही तर ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने पाहणार नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंची जीभ चालत आहे."
 
हे वाचलंत का? -  "उबाठा गटाच्या घराला..."; शिरसाटांचा राऊतांना टोला
 
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात २ दिवस मंत्रालयात गेले. अन्यथा मातोश्रीवर असायचे. पण आता मात्र रामलीला मैदानावर इंडी आघाडीच्या बैठकीला जातात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ५ खासदार आणि १६ आमदार आहेत. येणाऱ्या निवडणूकीपर्यंत १६ मधील ५ आमदार राहतील १० राहणार नाहीत. अशी व्यक्ती रामलीला मैदानावर जाऊन देशाच्या पंतप्रधानांवर बोलतात. त्यांचा राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? भाजपचे ३०३ खासदार आहेत आणि तुमचे केवळ ५ आहेत," असे ते म्हणाले.
 
"भाजपला तडीपार करणार असे ते म्हणतात. उद्धव ठाकरे स्वत:ला काय समजतात माहिती नाही. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे असं मला वाटतं. पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी आणि गुणवत्ता नसताना भाजपला तडीपार करण्याची भाषा ते करतात. भाजप हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे. याबद्दल जरा माहिती घ्या. नुसता सामना वाचू नका. बंडलबाज संपादकाने लिहिलेले लेख वाचू नका, बाकीचेही वाचा," असा सल्लाही त्यांनी दिला.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121