भाजपमध्ये जाणार का? अशोक चव्हाणांनी दिलं 'हे' उत्तर

    12-Feb-2024
Total Views | 140

Ashok Chavhan


मुंबई :
भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही आणि भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. माझी पुढची राजकीय भुमिका एक दोन दिवसांत जाहीर करेन, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी नुकताच आपल्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का? यावर ते म्हणाले की, "भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही आणि भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी माझ्या जन्मापासून तर आतापर्यंत काँग्रेससोबत काम केलेलं आहे. पण आता मला वाटलं की, आता अन्य पर्याय बघायला हवेत. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. मला कोणाबद्दलही तक्रार करायची नाही. व्यक्तिगत कोणाबद्दल काहीही माझ्या मनात वेगळी भावना नाही. यापुढच्या राजकीय दिशेबाबत येत्या एक दोन दिवसांत निर्णय घेईल. अद्याप मी काहीही ठरवलेलं नाही. यासाठी मला थोडा अवधी लागेल," असे ते म्हणाले.
 
"मला पक्षांतर्गत गोष्टीची कुठलीही जाहीर वाच्यता करायची नाही. कुणाची उणीधुणी मला काढायची नाही. तो माझा स्वभाव नाही. मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवं असं मला वाटल्याने मी राजीनामा दिला आहे," असेही ते म्हणाले आहेत.
 
जागावाटपात गती नाही!
 
"महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत ज्या गतीने काम व्हायला हवं होतं त्या गतीने ते होत नाहीये, हे मला जाणवलं. त्यामुळे जर हे काम लवकरात लवकर झाले असते तर निश्चितच महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला असता," असेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तसेच मी राजीनाम्याबाबत आज कुणाशीही बोललो नसून कुठल्याही आमदाराशी संपर्क साधलेला नाही, असे ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121