कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ ; गोहत्या आणि धर्मांतर विरोधी कायदाही रद्द होणार

    26-May-2023
Total Views | 111
karnataka hijab

नवी दिल्ली
: “कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच अल्पसंख्याकांचे लांगूलचालन पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. शाळा व महाविद्यालयांतील ‘हिजाब’बंदी मागे घेण्यात येणार आहे. तसेच, गोहत्या आणि धर्मांतर विरोधी कायदाही रद्द केला जाईल,” असे कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खर्गे यांनी सूचित केले आहे. 

प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे की, “काँग्रेस सरकार घटनाबाह्य व एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन करणार्‍या सर्वच कायद्यांचे पुनरावलोकन करेल. या कायद्यांचा राज्याच्या प्रतिमेवर परिणाम होत असेल, तर ते रद्दही केले जातील. कर्नाटक सरकार लवकरच शाळा-महाविद्यालयांमधील ‘हिजाब’ बंदी मागे घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांक यांचे हे विधान आले आहे.

खर्गे म्हणाले की, “ ‘हिजाब’ परिपत्रक लागू झाल्यापासून किमान १८ हजार अल्पसंख्याकांनी शाळा सोडली आहे. त्यांनी पुन्हा मुख्य प्रवाहात येऊन आपले शिक्षण सुरू करावे, असा आमचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या गोटातील सूत्रांच्या मते, राज्य सरकार ‘हिजाब’वरील परिपत्रक मागे घेण्यासह मागील भाजप सरकारने आणलेले गोहत्या कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ व धर्मांतर विरोधी कायदे रद्द करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

एकीकडे इराणसारख्या कट्टरपंथी देशातील महिलांनी ‘हिजाब’सक्तीविरोधात आंदोलन करून जगासोबत चालण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस सरकार ‘हिजाब’ बंदीचे परिपत्रक मागे घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काळात कर्नाटक काँग्रेसची वाटचाल कोणत्या दिशेने जाणार आहे, याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.

बजरंग दलावर बंदीचे संकेत

कर्नाटकमध्ये असंतोष व द्वेषाची बीजे पेरणारी कोणतीही धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक संघटना खपवून घेतली जाणार नाही. आम्ही कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने त्यांचा सामना करू. बजरंग दल किंवा इतर कोणतीही संघटना असो. त्यांच्यामुळे कर्नाटकातील कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असेल, तर आम्ही त्यांच्यावर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे प्रियांक खर्गे म्हणाले.


अग्रलेख
जरुर वाचा
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121