'या' कारणामुळे रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही : भरत जाधव

नाट्यगृहाची दूरावस्थेमुळे भरत जाधव यांची नाराजी

    21-May-2023
Total Views | 845
bharat-jadhav-says-he-will-not-perform-natak-show-again-in-ratnagiri

रत्नागिरी
: अभिनेता भरत जाधव सध्या ' तू तू मी मी' या नाटकाचे राज्यात प्रयोग करत आहे. रत्नागिरीत दि.२० मे रोजी त्यांचा नाटकाचा प्रयोग होता. यावेळी नाट्यगृहातील AC बंद होता. तसेच पंखेदेखील नाट्यगृहात नव्हते.तसेच नाट्यगृहाची स्वतांची साऊंड सिस्टम नसल्याने कलाकारांना त्रास सहन करावा लागला. प्रेक्षकांना देखील प्रचंड उकाड्याच हे नाटक पाहावे लागल्याने भरत जाधव संतापले आणि या प्रयोगानंतर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही , असे म्हणाले.
 
भरत जाधव यांनी नाटकाच्या प्रयोगानंतर जाहीर केले की, नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही. मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. 'एससी नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पाहा', अशी कळकळीची विनंती भरत यांनी प्रेक्षकांना केली. त्यांनी असेही म्हटले की अशी परिस्थिती असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता? शिवाय 'रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही', असंही ते त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.




अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121