अंदमान-निकोबार बेटांना 'परमवीर चक्र' विजेत्यांची नावे

    14-Feb-2023
Total Views | 158
21 Islands in Andaman Nicobar Named After Param Vir Chakra Awardees

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ जानेवारी या पराक्रम दिनी अंदमान-निकोबार द्वीप समूहातील सगळ्यात मोठ्या २१ निनावी बेटांचे नामकरण केले. या बेटांना देशाच्या २१ 'परमवीर चक्र' विजेत्या वीर सैनिकांची नावे देण्यात आली आहेत. ही २१ बेटे अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा भाग आहेत. या बेटांचे आजवर नामकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या बेटांबद्दल कोणालाही विशेष माहिती नव्हती. देशाची शान असलेली हि बेटे आजवर दुर्लक्षितच राहिली. पण केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता अंदमान-निकोबार द्वीप समूहातील २१ निनावी बेटे ही, देशाच्या 'परमवीरचक्र' विजेत्या वीर सैनिकांच्या नावाने ओळखली जातील.


Ross Island
 
(रॉस द्विप )
 याआधी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील रॉस द्विपचे नाव बदलून 'नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप' असे नाव दिले आहे.




Nile Island

(निल द्वीप)
त्याचबरोबर निल द्वीपचे 'शहीद द्वीप' असे नामाकरण करण्यात आले होते. 



Havelock Island

(हॅवलॉक द्विप)

 हॅवलॉक द्विपचे 'स्वराज द्वीप' असे नामकरण करण्यात आले.अंदमान-निकोबार द्वीप समूहातील निनावी बेटांना देशाच्या 'परमवीर चक्र' विजेत्या सैनिकांची नावे देण्याचा मोदी सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून, योग्य आहे. अंदमान-निकोबार द्वीपसमूहाला ऐतिहासिक महत्व आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटावर स्वातंत्र्य भारताचा तिरंगी ध्वज फडकवला होता. अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील २१ बेटांना देशाच्या ज्या २१ 'परमवीर चक्र' विजेत्या वीर सैनिकांची नावे देण्यात आली आहेत. त्या सैनिकांचे देशासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. पण भारतमातेच्या या वीर सुपुत्रांना म्हणावा तसा सन्मान, आधीच्या सरकारांनी दिला नाही. परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. पण केंद्रातील मोदी सरकारने अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील निनावी बेटांना देशाच्या 'परमवीर चक्र' विजेत्या वीर सैनिकांची नावे देऊन, देशाच्या परमवीर चक्र विजेत्या सैनिकांचा यथोचित सन्मान केला आहे. आज खऱ्या अर्थाने देशाच्या 'परमवीर चक्र' विजेत्या सैनिकांचा सन्मान झाला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121