PHOTO ; भारतातील सर्वात जुनी ट्रेन पंजाब मेल झाली १०९ वर्षांची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2021
Total Views |

punjab 3 edited_1 &n
 
 
 एलएचबी कोचसह सुरू असलेली भारतातील सर्वात जुनी ट्रेन
 
 
मुंबई : पंजाब मेल या भारतीय रेल्वे मधील सर्वात जुन्या ट्रेनला १०९ वर्षे पूर्ण होत असून दि. १.६.२०२१ रोजी ११०व्या वर्षात प्रवेश करीत आहे. दि. २२ मार्च २०२० पासून कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या असल्या तरी अनलॉक झाल्यावर दि. १.५.२०२० पासून या सेवा विशेष गाड्या म्हणून पुन्हा हळूहळू सुरू केल्या गेल्या. तथापि, विशेष पंजाब मेल दि. १.१२.२०२० पासून एलएचबी कोचसह सुरू करण्यात आली. एलएचबी डब्यातून प्रवाशांना अधिक सुरक्षा आणि सुखद प्रवासाचा अनुभव देतात.
 
 
पार्श्वभूमी
 
मुंबई ते पेशावर चालणा-या पंजाब मेलची सुरूवात खर म्हणजे अस्पष्ट आहे. अंदाजपत्रकातील १९११ च्या आधारे आणि दि. १२ ऑक्टोबर, १९१२ रोजी 'दिल्ली येथे काही मिनिटांनी ट्रेनच्या उशिरा झालेले आगमन' याविषयी प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवर पंजाब मेल दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकातून प्रथमच सुटल्याचा (सुरू झाल्याचा) अंदाज करण्यात आला आहे.
 
पंजाब मेल अधिक 'ग्लॅमरस' 'फ्रंटियर मेलपेक्षा' १६ वर्षांनी जुनी आहे. ' बॅलार्ड पियर' मोल स्टेशन खर म्हणजे 'जीआयपी' रेल्वे सेवांसाठी एक केंद्र होते. पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड असे तिला संबोधन केले जात होते, शेवटी १ जून १९१२ रोजी ही मेल सुरू झाली. प्रारंभी, 'पी आणि ओ स्टीमर्स 'मेल मधून आणले जात होते .साऊथॅम्प्टन आणि बॉम्बे दरम्यान स्टीमरचा प्रवास तेरा दिवस चालला. ब्रिटिश अधिकारी मुंबईला जाण्यासाठी तसेच त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी अंतर्देशीय रेल्वेने प्रवासासाठी एकत्रित तिकिटे घेत असत. त्यामुळे येथे आल्यावर ते मद्रास, कलकत्ता किंवा दिल्ली यापैकी एका रेल्वेगाडीत बसत.
 
ounjab train 1 edited_1&n
 
 
पंजाब लिमिटेड निश्चित टपाला दिवशी मुंबईच्या 'बेलार्ड पियर' मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्ग मार्गे, सुमारे ४७ तासांत २४९६ किमी अंतर कापत असे. ट्रेनमध्ये सहा कारचा समावेश असे. तीन प्रवाशांसाठी आणि तीन टपाल माल आणि टपालासाठी. तीन प्रवासी डब्ब्यांतील प्रवाशांची क्षमता फक्त ९६ प्रवासी होती. चमचमते सर्व डब्बे एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत जाऊ शकणारे (कॉरिडॉर कार) होते आणि डब्बे प्रथम श्रेणीच्या, दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह बनवले गेले. उच्च-श्रेणीतील प्रवाशांसाठी असल्याने गाडयांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा असत त्यामध्ये लॅव्हॅटरीज, बाथरूम, एक रेस्टॉरंट कार, सामानासाठी एक डबा आणि एक डबा गो-या साहेबांच्या नोकरांकरीता असे.
 
फाळणीपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटीश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरुन मोठ्या प्रमाणात जात होता आणि पेशावर छावणी येथे संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात होता. १९१४ पासून या ट्रेनचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली आणि याची दैनिक सेवा सुरू झाली.
 

punjab train 4 edited_1&n
 
 
मुख्यत: उच्च वर्गाच्या गो-या साहेबांच्या सेवेपासून पंजाब मेलने लवकरच निम्न वर्गातही सेवा पुरवायला सुरुवात केली. १९३० च्या दशकाच्या मध्यात पंजाब मेलमध्ये तृतीय श्रेणीचे डब्बे दिसू लागले. १९१४ मध्ये, मुंबई ते दिल्ली हा जीआयपी मार्ग सुमारे १,५४१ किमीचा होता. हे अंतर ही ट्रेन २९ तास व ३० मिनिटात पूर्ण करीत असे.
१९२० च्या दशकाच्या सुरूवातीस, सुमारे अठरा मधले थांबे असूनही प्रवासाची वेळ कमी करून २७ तास १० मिनिटे करण्यात आली. १९७२ मध्ये, प्रवासाची वेळ पुन्हा २९ तासांपर्यंत वाढविण्यात आली. २०११ मध्ये पंजाब मेल मधे तब्बल ५५ मधले थांबे आहेत. सन १९४५ मध्ये पंजाब मेलला वातानुकूलित डब्बा जोडण्यात आला. दि. १/५/१९७६ पासून पंजाब मेल डिझेल लोकोमोटिव्हसह चालविण्यात येऊ लागली. (पूर्णतः डिझेलवर)
 
थळ घाटाच्या विद्युतीकरणानंतर, रेल्वे बॉम्बे 'व्हीटी ते मनमाड 'पर्यंत 'इलेक्ट्रिकवर' चालविण्यात येऊ लागली, तेथून 'डब्ल्यूपी क्लास स्टीम इंजिनने' चालविण्यात येत होती. १९६८ मध्ये सदर ट्रेन झांसीपर्यंत डिझेल वर चालविली जाऊ लागली तसेच लोडिंग १२ पासून १५ डब्ब्यांपर्यंत वाढले. डिझीलीकरण नंतर झांसी ते नवी दिल्ली, त्यानंतर १९७६ मध्ये फिरोजपूर पर्यंत वाढविण्यात आले. झाशी येथे दोन डब्ब्यांची भर पडत डब्ब्यांची संख्या १८ करण्यात आली. १९७० च्या उत्तरार्धात अथवा इ.स. १९८० च्या दशकाच्या पूर्वार्धात, पंजाब मेल चालविण्यासाठी 'डब्ल्यूसीएएम/1 ड्युअल करंट लोकोमोटिव्ह इगतपुरी' येथे डीसी ते एसी ट्रॅक्शन बदलून भुसावळ पर्यंत 'इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर' चालविले जात असे.
 
 
punjab train 2 edited_1&n
 
पंजाब मेल मुंबई ते फिरोजपूर 'कँटोन्मेंट' दरम्यान १९३० कि.मी. चे अंतर कापण्यासाठी ३४ तास आणि १५ मिनिटे घेते. ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनावर आहे. आता रेस्टॉरंट कारची जागा पेंट्री कारने घेतली आहे. सध्या विशेष पंजाब मेलमध्ये एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, १ 'पेंट्री कार', ५ सामान्य द्वितीय आसन श्रेणीचे डब्बे आणि एक जनरेटर व्हॅन आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@