भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2020
Total Views |

tarasing_1  H x



मुंबई :
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईतील मुलुंड मतदारसंघातील माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन झाले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. तारासिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी ८.३० वाजता लीलावती रुग्णालयात निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षातून शोक व्यक्त होत आहे.




“माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो,” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.तर,"अनेक वर्षे मुलुंड विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते , माजी आमदार सरदार तारासिंह यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. गोरगरिबांबाबत कणव बाळगणारा, सतत सक्रिय असणारा नेता भाजपाने आज गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली !" असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तारासिंह यांना श्रद्धांजली वाहिली. सरदार तारासिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सरदार तारासिंह यांनी मुंबई महापालिकेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. ५ वेळा नगरसेवक आणि ३ वेळा मुलुंडचे आमदार होते.
@@AUTHORINFO_V1@@