दिलासादायक : मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर!

    25-Aug-2020
Total Views | 48
Corona_1  H x W

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ!


मुंबई : मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी वाढत असून २४ दिवसांपूर्वी दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी आता ८७ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ही ७६ टक्क्यांवरुन ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.


कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे पालिकेला यश येत आहे. मुंबईत रोज एक हजारांच्या घरात रुग्ण आढळत असले तरी कोरोना कोविड सेंटर, पालिकेसह खासगी रुग्णालयात उपलब्ध केलेल्या खाटा यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होत आहे. सध्या कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने पालिकेसह कोरोना कोविड सेंटर मधील खाटा रिक्त पडल्या आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाचा कोरोना विरोधातील लढा यशस्वी होत असल्याने रुग्णदुपटीचा कालावधी वाढत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचा दर ही वाढत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


३१ जुलैला रुग्ण दुपट्टीचा कालावधी ७६ दिवसांवर पोहोचला होता. तर यात २४ दिवसांत वाढ होऊन रुग्ण दुपट्टीचा कालावधी आता ८७ दिवसांवर पोहोचला आहे. तर ३१ जुलैला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के होते. मात्र आता रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.


या २४ दिवसांत चाचण्यांचे प्रमाण दोन लाखांनी वाढले असून ३१ जुलैपर्यंत ५ लाख २६ हजार ९८२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात वाढ होऊन २४ ऑगस्टपर्यंत ७ लाख ९ हजार ५८३ चाचण्या करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.



अग्रलेख
जरुर वाचा
‘पिस्को

‘पिस्को' जीआय टॅगच्या वादाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रेडमार्क आणि जीआय मधील फरक केला स्पष्ट

पिस्को’ या अल्कोहोलिक पेयाच्या भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय (Geographical Indication - GI) टॅगच्या नोंदणीसंदर्भातील वादात दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने ‘जीआय कायदा, १९९९’ आणि ‘ट्रेडमार्क कायदा,१९९९’ मधील मुलभूत फरक स्पष्ट केला आहे. पेरू आणि चिली या दोन दक्षिण अमेरिकन देशांमधील संघटनांदरम्यान सुरू असलेल्या जीआय हक्कांवरील संघर्षावर सुनावणी करताना, जीआय आणि ट्रेडमार्क कायद्याचे स्वरूप आणि हेतू पूर्णत: भिन्न असल्याचे उच्च न्यायालयाने ..

राजस्थानात धर्मांतरविरोधी कायदा लवकरच लागू होणार? विहिंपच्या शिष्टमंडळाने घेतली भजनलाल शर्मा यांची भेट

राजस्थानात धर्मांतरविरोधी कायदा लवकरच लागू होणार? विहिंपच्या शिष्टमंडळाने घेतली भजनलाल शर्मा यांची भेट

जयपूर येथील बळजबरी आणि फसवणुकीच्या माध्यमातून होत असलेल्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांबाबत विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार, प्रादेशिक संघटन मंत्री राजाराम, प्रादेशिक मंत्री सुरेश उपाध्याय व इतर अधिकाऱ्यांनी राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या विरोधात सर्वात कठोर कायदा करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शिष्टमंडळाच्या मागणीनुसार कठोर कायदे करण्याचे आश्वासन दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121