ताडोबा अभयारण्यात वाघिणीची शिकार

    13-Apr-2019
Total Views | 77



चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरीक्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळली. मात्र, हा ताडोबातील वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू नसून तिची शिकार करण्यात आली आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या फाशात अडकून दोन वर्षांच्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात वाघ अडकला. त्यात त्याचा मृत्यू झाला. कोअर झोन हे वाघांसाठी सर्वात सुरक्षित मानले जाते. येथे जंगल आणि वन्यजीवांची सर्वाधिक घनता आहे. अशा ठिकाणी शिकारीसाठी सापळा लावला होता. यामुळे वन विभागाच्या सुरक्षा यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर क्षेत्रसंचालक आणि कोअर विभागाचे उपसंचालकांनी घटनास्थळी भेट दिली असून याची माहिती घेतली. ताडोबात वनअधिकारी असताना अशी शिकार कशी झाली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

'सिंदूर' नावात राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121