शासकीय योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी नवी 'एसओपी'

    10-Jul-2025   
Total Views |

मुंबई : शासकीय योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला नवीन कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील. या कार्यप्रणालीत दोषी अधिकाऱ्यांचे केवळ निलंबनच नव्हे, तर शिक्षेचीही तरतूद असेल, अशी माहिती वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

आ. राजेश पवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत आहे. नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेत अनियमितता आढळली. शासनाने याची गंभीर दखल घेत चौकशी केली. या गैरव्यवहार आणि शासकीय रकमेच्या अपहार प्रकरणी २२ पैकी ८ क वर्गातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर गट ब वर्गातील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन पुढील आठ दिवसांत होईल, असे जयस्वाल यांनी सांगितले.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.