महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या सीसीसीपी कोर्सचा यशस्वी समारोप

    03-Nov-2017
Total Views | 10

 


 

जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय बॉक्सर तयार होतील : बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक जयसिंग पाटी

शिरपूर : धुळे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॉक्सर आहेत, फक्त त्यांना शोधून प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू सुभेदार जयसिंग पाटील यांनी शिरपूर येथील स्व.विश्वासराव रंधे संकुलात झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. सीसीसीपी प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना आणि जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले.

 

सीसीसीपी प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सुभेदार जयसिंग पाटी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे सदस्य मिलन वैद्यधुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र बोरसेप्रा.राधेश्याम पाटी उपस्थित होते.  प्रशिक्षक सुभेदार जयसिंग पाटी यांचा सत्कार जितेंद्र बोरसे यांनी तरमिलन वैद्य यांचा सत्कार राधेश्याम पाटी यांनी केला.

 

धुळे जिल्ह्यात लवकरच बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरु : मयूर बोरसे

धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस यांच्या प्रयत्नाने लवकरच बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. बॉक्सिंग खेळाला व्यासपीठ मिळून बॉक्सिंगचा प्रचार आणि प्रसार होईल व धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. 

 

यावेळी कपिल शिंपीविजेंद्र जाधवधीरज पाटीअक्रम शेखदिपक ढोलेअमोल शिरसाठपूनम उठवाल, नेहा कासार, हेमांगी मराठे, गौरव परदेशीभुषण पवार, योगेश पाटी आणिनिलेश धनगर आदी उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121