इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

    19-Apr-2025
Total Views | 29
 
Devendra Fadanvis
 
छत्रपती संभाजीनगर : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे. याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून अनेकांकडून याला विरोध करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. सर्वांनी मराठी भाषा शिकायलाच हवी. त्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असल्यास तीदेखील शिकता येते. पण हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही? याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे. पण मराठीला कुणी विरोध केल्यास आम्ही सहन करणार नाही," असे ते म्हणाले.
 
नाशिकमधील दंगलीबाबत बोलताना ते म्हणाले की, "नाशिकमध्ये सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वत: ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी काही लोकांनी जाणीवपूर्वक दगडफेक करून दंगा तयार केला. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे."
 
भगवतगीता आणि नाट्यशास्त्राची युनेस्कोमध्ये नोंद ही अभिमानाची बाब!
 
"भगवतगीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाचे सत्य सांगणारा विचार भगवतगीतेतून प्रतिपादित झाला आहे. आपले नाट्यशास्त्र अतिशय प्राचिन आहे. त्यामुळे त्याला युनेस्कोमध्ये जागा मिळत असल्यास सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्टी आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

परदेशात जाऊन घेतलेल्या शिक्षणाला, भारतीय जनमानसामध्ये एक वेगळेच महत्त्व मिळते. त्यामुळे, अनेक विद्यार्थी करिअरसाठी परदेशाची वाट धरतात, यामध्ये अमेरिकेचा मान सर्वात मोठा. तिकडे जाण्यासाठी इच्छूकांची गर्दी असते. आजवर अमेरिकाही या विद्यार्थ्यांसाठी रेड कार्पेट घालत होती. मात्र, आता अमेरिकेने त्यांच्या व्हिसा धोरणात बदल करण्यास सुरुवात केल्याने, अमेरिकेत जाणे थोडे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कामाची उपलब्धता सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि ..

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121