"उबाठाचे ८ आमदार संपर्कात! लवकरच शिंदेंशी भेट घडवून देणार"; बड्या नेत्याचा दावा

    03-Apr-2024
Total Views | 172
 
Uddhav Thackeray
 
नागपूर : उबाठा गटाचे ८ आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट घडवून देणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत सध्या रामटेक दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.
 
उदय सामंत म्हणाले की, उबाठा गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी ८ आमदार माझ्या संपर्कात आहे. मी त्यांची शिंदे साहेबांशी भेट घालून देणार आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांची नावं समोर येतील." यावेळी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हेदेखील उपस्थित होते.
 
रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, "काँग्रेसने रामटेकमधून एका महिला भगिनीला उमेदवारी दिली आहे. त्यांचा फॉर्म बाद होणार हे माहिती असताना त्यांनी उमेदवाराची बदनामी करण्यासाठी उमेदवारी दिली होती. या सगळ्याचं खापर ते विरोधकांवर फोडत आहेत. याशिवाय त्यांनी पर्यायी एबी फॉर्मदेखील नागपूरमध्ये तयार ठेवला होता. परंतू, काहीही झालं तरी महायूतीचेच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत," असे ते म्हणाले.
 
तसेच येत्या १० तारखेला रामटेकमध्ये महायूतीची मोठी सभा होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या वतीने सगळे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आहे. त्यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य असतील, असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121