अंकित सक्सेना हत्याकांड! अकबर अली, शहनाज आणि मोहम्मदला कोर्टाने सुनावली जन्मठेप

    08-Mar-2024
Total Views | 64
 Ankit Saxena murder case
 
नवी दिल्ली : देशातील चर्चित अंकित सक्सेना हत्या प्रकरणात (Ankit Saxena murder case), तीन दोषींना गुरुवारी, दि ७ मार्च २०२४ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. फेब्रुवारी २०१८ मध्ये पश्चिम दिल्लीतील रघुबीर नगरमध्ये २३ वर्षीय अंकितची हत्या करण्यात आली होती. अंकितची प्रेयसी शहजादीचे आई-वडील आणि काकांनी अंकितला बाजारात बकरी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने भोसकून ठार केले होते.
 
या प्रकरणात न्यायालयाने अकबर अली (मुलीचे वडील), शहनाज बेगम (मुलीची आई) आणि मोहम्मद सलीम (मुलीचे काका) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनीलकुमार शर्मा यांनी तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अंकित सक्सेनाचा खून करणाऱ्या अकबर अली आणि मोहम्मद सलीमला त्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि शहनाज बेगमलाही हत्येला मदत केल्याबद्दल आणि अंकितच्या आईवर हल्ला केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
 
या प्रकरणी न्यायालयाने तिघांनाही दोषी ठरवून दि. २३ डिसेंबर २०१८ रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. यानंतर आता तिघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने नराधमांना भादंवि कलम ३०२ आणि ३४ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच वेळी, अंकितची आई कमलेश सक्सेना यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शहनाज बेहाद हिला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
 
हत्याकांडाच्या वेळी अंकितची आई आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. याप्रकरणी अंकितची आई कमलेश सक्सेना यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. अंकितच्या आईने सांगितले की, या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण त्यांनी माझ्या मुलाची हत्या केली. उल्लेखनीय आहे की दि. १ फेब्रुवारी २०१८ रोजी पश्चिम दिल्लीतील रघुबीर नगरमध्ये २३ वर्षीय छायाचित्रकार अंकितची त्याच्या २० वर्षीय मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी उघडपणे हत्या केली होती.
 
 
पोलिसांनी सांगितले की अंकितला अकबर अली, शहनाज बेगम, त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि काका मोहम्मद सलीम यांनी मारहाण केली. पोलिसांनी असेही सांगितले की, जेव्हा हे लोक अंकितशी वाद घालत होते, तेव्हा अंकितचे आई-वडील आणि मित्र त्याच्या मदतीला आले, पण या लोकांनी अंकितच्या आईलाही मारहाण केली. बकरी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या चाकूने त्यांनी अंकितवर वार केले. यानंतर अंकितला ई-रिक्षातून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अंकितला मृत घोषित केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ..

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121