सकाळच्या सत्रात शेअर बाजारात 'संमिश्र' प्रतिसाद

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात "संमिश्र" प्रतिसाद

    20-Feb-2024
Total Views | 27

stock market
 
 
मुंबई: आजच्या सकाळच्या सत्रात शेअर बाजारात संमिश्र वातावरण निर्माण झाले आहे. सेन्सेक्स १६५.४४ अंशाने वाढत ७२,५४८.७२ पातळीवर पोहोचला आहे. दुसरीकडे निफ्टी ४५.४० अंशाने कमी होत २२०६१ पातळीवर पोहोचला. निफ्टी निर्देशांकात १७ कंपन्यांना फायदा झाला असून ३३ कंपन्यांनी मात्र तोटा सहन करावा लागला आहे. कोटक बँक, पॉवर ग्रीड, अपोलो हॉस्पिटल, युपीएल, डॉ रेड्डीज या शेअर्सच्या भावात तेजी पहायला मिळाली दुसरीकडे आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, एम अँड एम, एचडीएफसी लाईफ या शेअर्स (समभागात) घट पहायला मिळत आहे.
 
यावेळी मुख्यतः चीनने कर्जावर कमी केलेले व्याजदर, जागतिक स्तरावरील रशिया युक्रेनचे युद्धसावट, क्रुड तेलाच्या किंमतीत झालेली घसरण याचे पडसाद बाजारात उमटत आहेत. बीएसी मिड कॅप निर्देशांकात कुठलाही बदल न जाणवता , मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्याने वाढले आहे. निफ्टी ५०, ५.८५ अंशाने घसरत २२११६.४० पातळीवर खाली घसरला आहे. शेवटचा निफ्टी निर्देशांक २२१३७ पातळीवर पोहोचला होता. बँक निफ्टी ४६,८९७.२५ पातळीवर पोहोचला असून बँक निफ्टीत सकाळी ३६१.७५ अंशाने वाढ झाली होती. बीएसीचा बँक निर्देशांक ४२२.३३ अंशा़ने वाढत ५३२१४.४३ पातळीवर पोहोचला आहे.
 
माध्यमात आलेल्या बातमीनुसार पेटीएम आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सगळ्या पर्यायांचा विचार करत आहे. त्यामध्ये विलिनीकरण, विक्री अशा विविध पर्यायावर चर्चा चालू असल्याचे सांगितले गेले होते. कालच्या प्रमाणे आजही ५ टक्क्याने समभागात वाढ झाली असून पेटीएम समभाग (शेअर) चर्चेचा विषय ठरला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121