डॉ. मनमोहन सिंग यांचा शायराना अंदाज होतोय व्हायरल!

सुषमा स्वराजांसोबत झालेल्या शाब्दिक वादाचे डॉ. मनमोहन सिंग यांचे शायरीत प्रत्युत्तर

    27-Dec-2024
Total Views | 114
Manmohan singh

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांचे दि. २६ डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर २८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, परंतु संसदेत सुषमा स्वराज व मनमोहन सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यावर मनमोहन सिंग यांनी 'माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो देख', अशा शायरीतून प्रत्युत्तर दिले होते.

अर्थमंत्रालयाने डॉ. मनमोहन सिंग यांची वयाच्या २५व्या दखल घेतली. डॉ. मनमोहन सिंग कमी बोलणारे व्यक्तीमत्त्व असले तरी त्यांच्या विधानांनी ते विरोधकांची बोलती बंद करायचे. असाच त्यांचा काव्यशैलीचा हटके अंदाज संसदेच्या अधिवेशनात पाहायला मिळाला होता. संसदेत सुष्मा स्वराज व मनमोहन सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाल्यावर त्यावर प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एक शायरी संसदेच्या अधिवेशनात सादर केली होती. त्या शायरीने खुद्द सुषमा स्वराज यांच्या चेहऱ्यावर देखील हसू दिसून येत होते.

डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेतील अधिवेशनात सादर केलेली शायरी अशी होती की, 'माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो देख'. या शायरीवर अधिवेशनातील सर्व मंडळींनी या शायरीला दाद दिली होती. तसेच त्यांचे कौतुकदेखील केले होते.

अग्रलेख
जरुर वाचा
अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

परदेशात जाऊन घेतलेल्या शिक्षणाला, भारतीय जनमानसामध्ये एक वेगळेच महत्त्व मिळते. त्यामुळे, अनेक विद्यार्थी करिअरसाठी परदेशाची वाट धरतात, यामध्ये अमेरिकेचा मान सर्वात मोठा. तिकडे जाण्यासाठी इच्छूकांची गर्दी असते. आजवर अमेरिकाही या विद्यार्थ्यांसाठी रेड कार्पेट घालत होती. मात्र, आता अमेरिकेने त्यांच्या व्हिसा धोरणात बदल करण्यास सुरुवात केल्याने, अमेरिकेत जाणे थोडे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कामाची उपलब्धता सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि ..

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121