उबाठा गटाची पहिली यादी स्क्रीनिंगसाठी १० जनपथला! नितेश राणेंची टीका

    21-Oct-2024
Total Views | 82
 
Sanjay Raut
 
मुंबई : उबाठा गटाची पहिली यादी स्क्रीनिंगसाठी १० जनपथला गेली आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. रविवारी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "भाजपची पहिली यादी जाहीर झाली आणि संजय राऊतांनी त्यावर टीका केली. उबाठा गटाची पहिली यादी १० जनपथला स्क्रीनिंगसाठी गेली आहे. तिथून शिक्कामोर्तब झाल्यावर ती जाहीर होणार आहे. आम्ही कधीच दिल्लीसमोर झुकत नाही, असं बोलणारे संजय राऊत आणि त्यांच्या मालकांना प्रत्येकवेळी दिल्लीसमोर झुकावं लागतं," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "भाजपचे सगळे उमेदवार कामाला लागले असून महायूती म्हणून आम्ही या स्पर्धेत अव्वल नंबर मिळवणार आहोत. महाविकास आघाडीत सुरु असलेला गँगवॉर थांबताना दिसत नाही. ज्या हॉटेलमध्ये मविआच्या बैठका सुरु आहेत त्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास बिग बॉस हाऊसपेक्षाही चांगलं दृश्य बघायला मिळेल. प्रत्येकाला कसं जिंकायचं आहे, हेच तिथे बघायला मिळेल. त्यामुळे संजय राऊतांनी आमच्यावर बोलण्याआधी त्यांच्या घरातील गँगवॉर थांबवावा," असा खोचक सल्लाही नितेश राणेंनी राऊतांनी दिला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121