'फुलवंती'साठी हास्यजत्रेच्या कलाकारांना किती मानधन मिळालं? प्राजक्ता माळीनेच केला खुलासा

    15-Oct-2024
Total Views | 195
 
phullwanti
 
 
मुंबई : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली फुलवंती ही कादंबरी आता रुपेरी पडद्यावर आली आहे. प्राजक्ता माळी निर्मित आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत असून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील काही कलाकार देखील यात झळकले आहेत. दरम्यान, त्यांना किती मानधन दिलं त्याबद्दल आता प्राजक्तानेच खुलासा केला आहे.
 
'फुलवंती' या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारही पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात प्रसाद ओक, समीर चौघुले,चेतना भट्ट,रोहित माने, वनिता खरात, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप इत्यादी कलाकार पाहायला मिळत आहेत. 'फुलवंती' चित्रपटासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कलाकारांनी किती मानधन घेतलंय याबद्दल आता प्राजक्ताने खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकारांनी किती रुपये मानधन घेतलं हे सांगितलं आहे. ती म्हणाली की, "मी शोसोबत काम करते तर माझ्या पहिल्या निर्मित सिनेमात माझे आवडीचे कलाकार असावेत. त्यामुळे मी ठरवून त्यांना या चित्रपटात कास्ट केलं आहे. मी त्यांना प्रेमाने विनंती केली आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या एकाही सदस्याने मानधन न घेता चित्रपटात काम करायला होकार दिला".
 
मिळालेल्या माहितीनुसार 'फुलवंती' चित्रपटाने पहिल्या दिवशी ८ लाख, दुसऱ्या दिवशी ३६ लाख आणि तिसऱ्या दिवशी ७५ लाखांची कमाई करत एकूण१ कोटी १९ लाखांची कमाई चित्रपटाने केली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल...

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121