३ हजार लोकसंख्या असलेल्या गावात आता ग्रंथालय; महायुती सरकारचे पाऊल

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय धोरणात ५० वर्षांनी होणार सुधारणा

    06-Jan-2024
Total Views |
Government of Maharashtra Liabrary decision

मुंबई :
किमान ३ हजार लोकसंख्या असलेल्या राज्यातील प्रत्येक गावात आता सुसज्ज असे ग्रंथालय उभारले जाणार आहे. 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमा'त सुधारणा करण्याबाबत गठीत केलेल्या समितीने आपल्या अहवालात तशी शिफारस केली असून, आगामी अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

राज्यातील ग्रंथालयांच्या संदर्भात 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७' लागू आहे. या अधिनियमाला १ मे १९६८ रोजी संमती मिळाली होती. त्याला ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी कोणत्याही सुधारणा न केल्याने ग्रंथालयांच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे राज्यातील ग्रंथालयांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी महायुती सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. ग्रंथालय संचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीने प्रचलित अधिनियमात अनेक सुधारणा करण्याच्या शिफारसी आपल्या अहवालात केल्या आहेत. शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील ज्या गावांची लोकसंख्या ३ हजारांपेक्षा अधिक आहे, तेथे ग्रंथालय स्थापन करण्याची शिफारस त्यात करण्यात आली आहे. त्यानुसार, ३ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ज्या गावांमध्ये सध्या शासनमान्य ग्रंथालय नाही, अशा गावांची माहिती सादर करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले आहेत. तसेच या अहवालातील आवश्यक कालानुरुप सुधारणांच्या प्रारुपास त्यांनी मान्यता दिली असून, पुढील विहित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रंथालय इमारतींचे नुतनीकरण होणार

सन २०१२-१३ पासून ग्रंथालयांना मान्यता व दर्जाबदल देणे शासनाने स्थगित केले आहे. या बाबीवर नवीन कालसुसंगत निकष तयार करून प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तसेच शासकीय ग्रंथालय इमारतींची दुरुस्ती व नूतनीकरणाचे आवश्यकतेनुसार सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, असेही निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर व समितीचे सदस्य सचिव व ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121