अयोध्या तो बस झांकी है... काशी-मथुरा बाकी है : योगी आदित्यनाथ

    18-Jan-2024
Total Views | 87
 YOGI
 
मुंबई : "रामलला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे! अशी घोषणा आम्ही दिली होती. आज त्याच जागी राम मंदिर बांधण्यात येत आहे. अयोध्येसाठी जशी कायदेशीर लढाई लढली, तशीच मथुरा-काशीसाठीही लढली जाईल." असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज तक या हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
 
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा-काशीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. रामललासाठी आम्ही ५०० वर्षे संघर्ष केला. न्याय आणि सत्याचा सन्मानपूर्वक विजय मिळवूनच आम्ही रामललाचे मंदिर उभारत आहोत. त्याचप्रमाणे हे प्रकरणही कोर्टामार्फत सोडवू. आम्ही न्यायालयासमोर सर्व पुरावे सादर करू आणि आमची लढाई लढू."
 
जेव्हा त्यांना श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराची मंदिराची तारीख विचारण्यात आली तेव्हा योगी म्हणाले की, "सर्व काही कायदेशीर पद्धतीने केले जाईल. आपण प्रभूची तारीख कशी ठरवू शकतो? देवाची इच्छा असेल तेव्हा हे सर्व होईल."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ..

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121