अजितदादांनी केली खडसेंची पोलखोल! खडसेंना फोन केलाच नाही!

    25-Sep-2023
Total Views | 547

Ajit Pawar & Eknath Khadase


मुंबई  :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार गटाकडून आपल्याला ऑफर आली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता अजित पवारांनी एकनाथ खडसेंची पोलखोल केली आहे.
 
"मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारले होते. तसेच अजित पवारांतर्फे मिटकरींचा फोनही आला होता. पण मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. मी त्यांची साथ सोडणार नाही," असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून राहावं. भाजपकडे येण्यासाठी हातपाय जोडू नये," असे विधान केले होते. यावर एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली होती.
 
दरम्यान, अजित पवार यांना एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याविषयी विचारले असता, "मी कुणालाही फोन केला नाही. तसेच मी अमोल मिटकरींच्या मार्फत कशाला कुणाला फोन करेन? मी थेट बोलणारा माणूस आहे. कुणाशी बोलायचं असेल तर मी थेट बोलतो. कुणाच्याही मार्फत बोलत नाही," असे अजित पवार म्हणाले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121