संजय राऊत हक्कभंग प्रकरण : भूमिका मांडण्यासाठी वेळेची मागणी

राऊतांचे विधिमंडळाला पत्र

    08-Mar-2023
Total Views |
 
Sanjay Raut rights violation case
 
मुंबई : संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' असं म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला होता. विधिमंडळाने संजय राऊतांना ४८ तासांमध्ये आपलं म्हणणं लेखी मांडण्याची नोटीस दिली होती. शुक्रवारी ३ मार्च रोजी संध्याकाळी संजय राऊतांची खुलासा सादर करण्याची मुदत संपली होती. मात्र आज त्यांनी आपलं उत्तर सादर केलं आहे.
 
आपण केलेलं विधान हे विधीमंडळाला नाहीतर विशिष्ट गटाला उद्देशून बोललो आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा संजय राऊतांनी दावा केला आहे. विधीमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी नोटीस बजावण्यात आली होती.
''सभागृहाचा अवमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी केलेले वक्तव्य हे विधिमंडळातील त्या एका गटासाठी केले होते. भूमिका स्पष्ट करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात यावी.'' अशी राऊतांनी विधिमंडळाकडे मागणी केली.
 
संजय राऊत यांनी नोटीसीला उत्तर देताना म्हटलं की, मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्य गटापुरतं होतं. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासू पाहावं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील 'संन्यस्त खड्ग' नाटकाच्या प्रयोगावेळी नेमकं काय घडलं?

(Hrishikesh Joshi Post) पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १२ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी साडेसहा वाजता नाटकाला सुरुवात झाली, पण रात्री साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पुण्यात हे नाटक बंद पाडले गेले, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्याबाबत अभिनेते आणि नाटकाचे दिग्दर्शक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121