ठाण्यात दि. २२ मार्च रोजी सकाळी ठीक ६:४५ वाजता शिवाजी महाराजच्या पुतळ्याला वंदन करून श्री. कौपिनेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेस प्रारंभ झाला. पारंपारिक वेशभूषा घालून सर्व ठाणेकर शोभा यात्रेत सामील झाले होते. श्री कौपिनेश्वर आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळे यावेळी पार पडले. १९ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, शोभायात्रेत छायाचित्र स्पर्धा तसेच सेल्फी विथ शोभा यात्रा अशाही नव्या पिढीला, तरुणाईला आकर्षून घेणाऱ्या होत्या. वीरगर्जना पथक आपले ध्वज फडकावत उल्हासात ढोल व ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत करत होते. वाहनांवर मल्लखांब लावून बालमल्ल आपली कौशल्ये दाखवत होते. वेशभूषा स्पर्धेत अनेक जण स्वातंत्र्यसैनिकांचे वेष परिधान करून उपस्थित होते.