राम मंदिर लोकार्पणासाठी राज ठाकरेंना निमंत्रण पण उद्धव ठाकरेंना नाही! वाचा, मंत्र्यांनी सांगितलं कारण

    26-Dec-2023
Total Views | 300

Raj Thackeray & Uddhav Thackeray


मुंबई :
राज्यात सध्या राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. यातच केंद्र सरकारला व्हीव्हीआयपी वाटत आहेत त्यांना अपेक्षित आहेत ते जाणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना निमंत्रण दिलं आहे पण उद्धव ठाकरेंना नाही, असे वक्तव्य मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. महालक्ष्मी सरसच्या उद्धाटनानंतर त्यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
 
गिरीष महाजन म्हणाले की, "अयोध्येतील राम मंदिरात उद्धव ठाकरेंचं काय योगदान आहे हे संपुर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे आपण व्हीव्हीआयपी आहोत असे त्यांना जरी वाटत असले पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते नसतील. त्यामुळे त्यांना बोलवलं नाही. जे खऱ्या अर्थाने व्हीआयपी आहेत त्यांना सरकारने बोलवलं आहे."
 
आयत्या बिळावर नागोबा  
संजय राऊतांविषयी बोलताना ते म्हणाले की, "घरी बसून भुमिका घेणं आणि प्रत्यक्षात जाऊन काम करणं यात खूप फरक आहे. कारसेवाच्या वेळी काय झालं हे सगळ्या देशाला माहिती आहे. कारसेवा कोणी केली, कोणाचं योगदान आहे, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही २० दिवस जेलमध्ये होतो. जंगलातून ५० किलोमीटर पायी प्रवास करुन तिथे पोहोचलो. तेव्हा उद्धवजी आणि संजय राऊत कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंची भुमिका स्पष्ट होती. त्यांचं राम मंदिराला समर्थन होतं यात दुमत नाही. पण हे आयत्या बिळावर नागोबा येऊन बसले आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी आणि उद्धवजींनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा, असेही ते म्हणाले.
 
तसेच "केंद्र सरकारला जे व्हीव्हीआयपी वाटत आहेत त्यांना अपेक्षित आहेत ते जाणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना निमंत्रण दिलं आहे. जे सातत्याने केंद्र सरकारवर राम मंदिराबाबत टीका करतात त्यांना आमंत्रण देण्याचं काय कारण आहे? त्यामुळे त्यांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही," असा टोलाही महाजन यांनी लगावला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121