सुषमा अंधारेंचा माफी मागण्यास नकार; हक्कभंगाची कारवाई अटळ

    23-Dec-2023
Total Views | 106

Sushma Andhare


मुंबई :
विधानपरिषदेच्या प्रभारी सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर चुकीचे आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
आमदार रवींद्र धंगेकर यांना उपसभाती सभागृहात बोलू देत नाही, अशा आशयाचा ‘व्हिडिओ’ उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. धंगेकर हे विधान परिषदेचे सदस्य नसल्याने त्यांना बोलू न देण्याचा काही प्रश्‍नच नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणावा, असा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी सभागृहात ठेवला. यावर सभागृहात चर्चा झाल्यावर सुषमा अंधारे यांनी ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव ठेवण्यास अनुमती देण्यात येईल, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिले होते.
 
याबाबत सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना उद्देशून संस्कृत भाषेत पत्र लिहिले आहे. 'मी माफी मागणार नाही. त्यासाठी मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल. लोकशाही वाचवण्यासाठी मी लढायला तयार आहे. हक्कभंगाची कारवाई झाली तरी मी माफी मागणार नाही', असे अंधारे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सभागृहाचा अवमान करणाऱ्या अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली जाणार आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121