मुंबई : दूरसंचार विभाग नोकरीची संधी मिळणार आहे. दूरसंचार विभागात नोकरभरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून "संयुक्त सल्लागार" या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
दूरसंचार विभागातील भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून दूरसंचार विभाग भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अर्जदारास अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २५ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.