ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात हिंदूंतर्फे कॅव्हेट दाखल

    14-Sep-2022
Total Views | 108
 

 

नवी दिल्ली: ज्ञानवापीप्रकरणी मस्जिद समितीच्या वतीने वाराणसी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात कोणत्याही प्रकारची याचिका दाखल झाल्यास, त्याची माहिती हिंदू पक्षास द्यावीअशी विनंती करणारी कॅव्हेट याचिका श्रृंगारगौरी प्रकरणातील याचिकाकर्त्या रेखा पाठक यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे.;

 वाराणसी दिवाणी न्यायालयाने १२ सप्टेंबर रोजी ज्ञानवापी संकुलातील श्रृंगारगौरीची नित्यपूजा करण्याची परवानगी देण्याची विनंती करणारी याचिका सुनावणीयोग्य असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर मुस्लिम पक्षाने वाराणसी न्यायालयाच्या आदेशास उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. त्याविषयी हिंदू पक्षातर्फे उच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली आहे.

 
त्यात म्हटले आहे की, जर मुस्लिम पक्षातर्फे ज्ञानवापीप्रकरणी वाराणसी दिवाणी न्यायालयाच्या निकालाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्यास त्यावर हिंदू पक्षाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मुस्लिम पक्षाच्यावतीने याचिका दाखल झाल्यास त्याची प्रत हिंदू पक्षास देण्यात यावी, असेही याचिकेमध्ये नमूद करण्यात आले असल्याची माहिती प्रकरणातील हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दैनिक शी बोलताना दिली आहे.’मुंबई तरुण भारत‘


अग्रलेख
जरुर वाचा
रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि.२७ रोजी गुजरातमधील वडोदरा येथील सावली येथे असलेल्या अल्स्टॉम या रेल्वेनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, सावलीचे आमदार केतनभाई इनामदार, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वडोदरा आणि अहमदाबादचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी होते. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या अल्स्टॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे ..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहेत. य.ाअपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत,तसेच ही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व २६.३४ लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअ..

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121