देशभर थैमान घालणारा लिम्पी विषाणू महाराष्ट्रात दाखल

    10-Sep-2022
Total Views | 128
limpy
 
 
मुंबई : कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच त्वचेशी निगडीत एका जीवघेण्या व्हायरसने सध्या देशभरात थैमान घातलेले आहे. अजून तरी हा व्हायरस गुरांमध्ये आढळून आलेला आहे, पण राजस्थान गुजरात सारख्या राज्यांमध्ये या रोगाने हाहाकार माजवला असून एकट्या राजस्थानातील बिकानेरमध्ये या विषाणूमुळे दररोज ३०० गाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. देशातील ५० टक्के गाई-म्हशी या विषाणूच्या विळख्यात आल्या असून हा विषाणू महाराष्ट्रात दाखल झाल्याने राज्याची चिंता वाढलेली आहे.
 
 
उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, मध्य प्रदेश पाठोपाठ लम्पी व्हायरस महाराष्ट्रात दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक जनावरांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे. देशातील १२ राज्यातील १६५ जिल्ह्यांमध्ये त्याचा संसर्ग पसरला आहे.
 
 
 
ज्या वेगाने या रोगाचा प्रसार होत आहे ते लक्षात घेता लिम्पीला महामारी घोषित करण्याची मागणी होत आहे. या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून या विषाणूचा प्रसार सुरु झाला असून २०१९ मध्ये ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रथमच त्याचा संसर्ग आढळला होता.
 
 
लम्पी स्किन आजार राजस्थान, पंजाब, गुजराज, हरियाणा, हिमाचल प्रदेशात आढळून आला होता. आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये देखील हा आजार आढळून आला आहे. पशुसंवर्धन विभागानं पशुपालकांना विशेष सूचना दिल्या आहेत. पुण्यासह जळगाव, अहमदनगर, धुळे, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात देखील प्रादुर्भाव आढळला आहे. पुण्यात २९ तर अहमदनगरमध्ये ६७ जनावरांना या आचाराजा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रात ८५० जनावरांना या आजारानं ग्रासलं होतं, त्यापैकी ५०० हून अधिक जनावरं बरी झाली आहेत.
 
लम्पी रोगाची लक्षणे
 
या आजाराची अनेक लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये ताप, वजन कमी होणे, लाळ वाहणे, डोळे व नाकातून पाणी येणे, कमी दूध येणे, शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी दिसतात. यासोबतच या आजारात शरीरात गाठीही तयार होतात. सोबतच यामुळे मादी गुरांना वंध्यत्व, गर्भपात, न्यूमोनिया, पांगळेपणाचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही दिसून आले आहे.
 
 
या रोगावरील उपाय
  
लिम्पी हा एक प्रकारचा विषाणू आहे आणि त्यावर कोणताही ठोस उपाय नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डास आणि माश्या यांसारख्या रक्त शोषणार्याव कीटकांमुळे हा आजार पसरतो. दूषित पाणी आणि चाऱ्यामुळे हा संसर्ग जनावरांना होतो. कोणत्याही प्राण्यामध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला इतर गाई व म्हशींपासून वेगळे करावे. त्यांचे पाणी किंवा चारा इतर कोणत्याही प्राण्याला देऊ नका. तसेच ज्या ठिकाणी लागण झालेला प्राणी ठेवला आहे त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121