मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुंबई महापालिका वॉर्ड पूर्नरचनेबद्दल चर्चा सुरू असताना आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटातील पक्षश्रेष्ठींवर थेट विधीमंडळातच आरोप लावले आहेत. सरवणकर ज्या शिवसेना भवननजीक दादरच्या मतदार संघातील वॉर्ड वरळीला जोडण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी आदित्य ठाकरेंवरच निशाणा साधला. माझ्या मतदार संघातील वॉर्ड हे वरळीला का नेण्यात आले, असा थेट सवाल त्यांनी विधानसभेत विचारला.
महाराष्ट्र विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेवेळी वॉर्ड पूर्नरचनेबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवत या प्रकरणी कुठला गैरव्यवहार झाला आहे का? वॉर्ड पूर्नरचना कोणाच्या सांगण्यावरुन केली आहे का? याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मी स्वतः याबद्दल न्यायालयात जाणार होतो. त्यावेळी मला रोखण्यात आले, असेही सरवणकर म्हणाले. प्रामुख्याने वरळी या आदित्य ठाकरेंच्या हा मतदार संघाला बळकटी देण्यासाठी हे वॉर्ड बदलण्यात आले आहेत, असा रोख सरवणकर यांचा होता.