कोलकत्ता: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या गदारोळाबद्दल कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले आहे. इस्लाम धर्मातील पैगंबरांच्या कथित अपमानावरून हा गोंधळ झाला होता. जर राज्य पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नसतील, तर सरकारने केंद्रीय दलांना पाचारण करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. दंगा झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करून हिंसाचारात सहभागी असलेल्या दंगलखोरांना ओळखावे. आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे ही निर्देश यावेळी देण्यात आले.
हिंसाचारात ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्यांना भरपाई देण्याच्या मुद्द्यावर राज्याच्या महाधिवक्त्यांनीही राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करावी. असे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती राजर्षी भारद्वाज यांच्या खंडपीठाने सांगितले आहे. उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दि १६ जूनपर्यंत रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत. आणि शांतता राखली जावी यासाठी राज्य सरकारने सर्व आवश्यक पावले उचलावी. असेही न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. राज्यसरकारला फटकारताना कोर्टाने "जर राज्य पोलीस कोणत्याही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरले, तर अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलून केंद्रीय दलांना बोलावले पाहिजे." असे म्हंटले आहे.
वेगवेगळ्या व्यक्तींनी दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. निलाद्री साहा नावाच्या व्यक्तीने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, जेव्हा भाजपचे कार्यालय जाळले जात असताना पोलिस मूक प्रेक्षक म्हणून उभे होते. याच याचिकेत लष्करी किंवा केंद्रीय निमलष्करी दल तैनात करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याच वेळी, दुसर्या याचिकेत दि. 9 जून रोजी हावडा अंकुरहाटी भागात राष्ट्रीय महामार्ग रोखून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर एफआयआर नोंदवावी. आणि मोठा दंड आकारण्याची मागणी केली आहे.
पैगंबराचा अपमान केल्याच्या नावाखाली बंगालच्या हावडा, मुर्शिदाबाद, 24 परगणा यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये दंगलखोरांनी प्रचंड गोंधळ घातला होता. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक तर केलीच, पण अनेक हिंदू कुटुंबांची घरेही पेटवली.त्याचबरोबर, नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी येथे १००० मुस्लिमांच्या जमावाने भारतीय रेल्वेला लक्ष्य केले आणि ट्रेनचे नुकसान केले होते. यावेळी अनेक प्रवासी जखमीही झाले. मुस्लिम जमावाने रेल्वे स्टेशन आणि ट्रेनवर दगडफेक केली होती .