"ठाकरे पितापुत्रांनी केला कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ"

मुंबईत बनावट कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट

    15-Feb-2022
Total Views | 81
                        
kiit somayya
 
 

मुंबई: पुणे महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली. पोलिसांकडेव ८९ पानांचे तक्रारपत्र त्यांनी दाखल केले आणि यावर ७ दिवसांत गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्या कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा हात होता असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

"पुणे महापालिकेने ब्लॅकलिस्ट केलेले असून सुद्धा संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्या कंपनीला कोविड सेंटरची १३ कंत्राटे दिली गेली. सुजीत यांनी कंत्राटे मिळवताना दाखवलेली कागदपत्रे बनावट असून त्यांच्या कडे पुरेसे मनुष्यबळसुद्धा नव्हते. कित्येक कोविड सेंटर्स मध्ये पुरेसे नर्सेस- वॉर्डबॉय नव्हते, एवढेच नव्हे तर बीएमएस डॉक्टर्सना एमडी डॉक्टर्स आहेत दाखवून रुग्णांची फसवणूक केली आणि जीवाशी खेळ केला" असे आरोप सोमय्या यांनी केले.

"माझ्या मुलाला आणि पत्नीला धमकावले जात आहे. संजय राऊत यांनी मला बरबाद केले तरी चालेल पण रुग्णांच्या जीवाशी खेळ करू नका. मी गेले १५ दिवस ही कागदपत्रे दाखवत आहे. तरीसुद्धा मुख्यमंत्री सुजीत पाटकरांना अटक का करत नाहीत?" असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.




अग्रलेख
जरुर वाचा
बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती...

ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले

ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले

त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121