अॅड. आशिष शेलार यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल!

    05-Dec-2022
Total Views |


हेही वाचा : 

राऊत, सीमावाद प्रश्नी आगलावेपणा करु नका! : अॅड. आशिष शेलार
मुंबई : संजय राऊत, सीमावाद प्रश्नी राजकारण आणून आगीत तेल ओतून आगलावेपणा करु नका, असा घणाघात मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले, "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. एकही गाव महाराष्ट्रातून जाण्याचा प्रश्न येत नाही. सर्वोच्च न्यायालयात देखील आम्ही आमची भूमिका मजबूत मांडली आहे.
 
 
"कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या वर नाहीत, अशी तंबी देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. हाताशी काही राहीलं नाही म्हणून संजय राऊत तुम्ही आगलावेपणा करु नका.” अशी स्पष्ट भूमिका आशिष शेलार यांनी मांडली. दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमत आहे, असे सांगताना शेलार म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे काल, आज आणि उद्या पूर्ण देशाचेच आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही असहमत आहोत." असे शेलार म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.