मतदारांना धमकावले म्हणणाऱ्यांना मिळालं उत्तर! नांदगावात भाजपचे ११ पैकी १० सदस्य विजयी!

अपप्रचार करणाऱ्यांचे दात घशात! नांदगावकर नितेश राणेंच्या पाठीशी ठाम

    20-Dec-2022
Total Views | 192

1 1 Nitesh Rane 1




कणकवली
 : सिंधुदुर्गातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. भाजपचे फायरब्रॅण्ड आमदार नितेश राणेंनी आपल्या मतदार संघात विजयश्री खेचून आणला आहे. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान नितेश राणेंच्या एका वक्तव्याचा विपर्यास करुन व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांना नांदगावातील मतदारांनी चोख प्रत्युत्तर देत आपण राणेंच्याच पाठीशी कायम असल्याचे लोकशाही मार्गाने दाखवून दिले आहे.





धमकावले म्हणणाऱ्यांचे दात घशात!

आमदार नितेश राणे यांनी माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडून आणल्यास हक्काने निधी मागा, असे आवाहन केले होते. नांदगावात सरपंचांसहित ११ पैकी १० सदस्य भाजपाचे विजयी केले. आमदार नितेश राणेंविरोधात चालवलेला सोशल मीडियावरील प्रचार फोल ठरल्याचे मतदारांनी दाखवत आपल्या आमदारावर विश्वास कायम ठेवला आहे. आमदार नितेश राणे यांनी समस्त नांदगाववासियांना हक्काने सांगितले होते की, "माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडुन आणा आणि हक्काने निधी मागा." त्याच नांदगाववासियांनी भाजपाचे सरपंच भाई मोरजकर आणि भाजपाचे ११ पैकी १० सदस्य निवडून दिले.

समस्त नांदगाववासिय राणे परिवारच्या पाठीशी आहेत, असा संदेश जनतेने मतपेट्यांतून दिला आहे. राणेंनी धमकावले म्हणणाऱ्यांचे नांदगावकरांनी दात घशात घातल्याची प्रतिक्रीया नितेश राणे समर्थकांनी यावेळी दिली आहे. कणकवली भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर आणि नवनिर्वाचित सरपंच भाई मोरजकर आणि कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. मंगळवारी आमदार राणे कणकवलीतील विजयी जल्लोषात सहभागी झाले होते.
कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील ९० टक्के ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. सिंधुदुर्गातील ३१५ पैकी २५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. आपल्या गावचा विकास करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही हे जनतेने कबूल केल्याने आज सिंधुदुर्गात भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. यापुढेही सर्व निवडणुका भाजपच जिंकेल आणि ठाकरे गटाला औषधालाही शिल्लक ठेवणार नाही, अशी प्रतिक्रीया आमदार नितेश राणेंनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. १७ पैकी १४ ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली. नितेश राणे यांनी यापूर्वीच १७ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आणल्या. मंगळवारी निकाल लागल्यानंतर आणखी नऊ ग्रामपंचायती भाजपाने मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैभववाडी तालुक्यात दोन ग्रामपंचायती ग्रामविकास पॅनलला मिळाल्या तर शिंदे गटाला एक ग्रामपंचायत मिळाली.





अग्रलेख
जरुर वाचा
बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे...

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्षानुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करतात. सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या घरातील गणेशाची विशेष चर्चा होते. २२ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या घरी प्रथमच बाप्पा आणला होता. तेव्हापासून ती सातत्याने बाप्पाला घरी आणते. शिल्पाच्या घरी बाप्पा बसल्यावर ते फक्त सेलिब्रेशन नसतं, तर एक ग्लॅमरस फेस्टिव्हल असतो. तिच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे लाईमलाईट, सेलिब्रिटी पाहूणे, डान्स, गाणी आणि एक वेगळाच जल्लोष. चाहते तिच्या घरासमोर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी या प्रथेत खंड ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121