आम्ही षड्यंत्र नाही मंत्र रचतो : साध्वी ऋतंभरा

    30-Sep-2020
Total Views | 45
sadhvi_1  H x W
 
लखनऊ : बाबरी वादग्रस्त ढाँचा प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयापूर्वी साध्वी ऋतंभरा यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रीया दिली आहे. आम्ही कुठलेही अपराधाचे षड्यंत्र रचले नाही आम्ही मंत्र रचतो, त्या म्हणतात. अयोद्धेत आता राम मंदिर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यासाठी कुठलीही किंमत मोजावी लागली तरी काहीच फरक पडत नाही, न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मंजूर असेल. त्यांनी सकाळी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
 
 
६ डिसेंबर १९९२ रोजीची घटना ही कुठल्याही प्रकारचे षड्यंत्र नव्हते. आकस्मित घटना होती. षड्यंत्र रचण्याची पद्धत आहे. आम्ही कुठल्याही संपत्तीवर बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ आस्थेच्या मुद्द्यावर रामललासाठी संघर्ष करण्यात आला होता.
 
 
आम्ही भाग्यशाली
 
साध्वी ऋतंभरा यांनी आम्ही भाग्यशाली आहोत, आम्हाला हा संघर्ष पहायला मिळला, असेही साध्वी ऋतंभरा म्हणाल्या आहेत. अयोध्या में राम मंदिर निर्माणासाठी पाचशे वर्षांचा संघर्ष सुरू होता. शेकडो लोकांनी यासाठी बलिदान दिले आहे. आम्ही भाग्यशाली आहोत. या संघर्षाला विराम लागलेला आम्हाला पहायला मिळाला आहे. श्रीराम जन्मभूमिवर भव्य राम मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील बांगलादेशची सद्यस्थिती पाहता हिंदू अल्पसंख्याकांवर अद्याप हल्ले होत आहेत. दक्षिण आशियाई देशातील हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशातील युनूस सरकार विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक प्रमुख ब्रिटिश राजकीय नेते, माजी आणि विद्यमान खासदार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला केली आहे. कन्झर्व्हेटिव्ह फ्रेंड्स ऑफ बांगलादेश (सीएफओबी) आयोजित एका चर्चासत्रात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121